दिल्ली : देशात अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) अनेक ठिकाणी विरोध झाला. मात्र दुसरीकडे या योजनेंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी (Agnipath Recruitment Scheme) भारतीय वायू दलाकडे रेकॉर्ड ब्रेक अर्ज प्राप्त झाले आहेत. याविषयी भारतीय वायू दलाने (Indian Air Force) सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
The online registration process conducted by #IAF towards #AgnipathRecruitmentScheme has been completed.
Compared to 6,31,528 applications in the past, which was the highest in any recruitment cycle, this time 7,49,899 applications have been received.#Agniveers pic.twitter.com/pSz6OPQF2V
— Indian Air Force (@IAF_MCC) July 5, 2022
यापूर्वी झालेल्या भरती प्रक्रियेदरम्यान सर्वाधिक ६,३१,५२८ अर्ज प्राप्त झाले होते. भारतीय वायू दलाने माहिती दिली की, अग्निपथ योजनेसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत यंदा ७,४९,८९९ अर्ज प्राप्त झाले आहेत. तिन्ही सैन्य दलात होणाऱ्या पुर्वीच्या भरती प्रक्रियेत बदल करत केंद्र सरकारने नवीन अग्निपथ योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेला तरुणांनी विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या योजनेसाठी लागणारी वयोमर्यादा २१ वरून २३ वर्ष केली होती.
[read_also content=”शरद पवार यांच्या भेटीवर मुख्यमंत्र्यांचा खुलासा; चर्चांना पूर्णविराम https://www.navarashtra.com/maharashtra/chief-ministers-revelation-on-sharad-pawars-visit-and-punctuation-to-discussions-nrgm-301162/”]
आता या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्याने भारतीय वायू दलाला उमेदवारांची निवड करण्यासाठी वेळ लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.