यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर म्हणाले, “‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा, देशाच्या अस्मितेचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांच्या राष्ट्रभावनेशी जोडलेली भावना आहे. त्यामुळे या राष्ट्रीय गीताचा कोणत्याही प्रकारे कथित अवमान आम्ही सहन करणार नाही. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र राष्ट्रभावना आणि देशाच्या गौरवाशी तडजोड होता कामा नये. ‘वंदे मातरम्’चा सन्मान राखण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सदैव ठामपणे उभा राहील.”आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. राष्ट्रीय गीताबद्दल आदर व्यक्त करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवला.
आंदोलनाच्या शेवटी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. सामूहिक गायनातून राष्ट्रीय गीताबद्दलचा आदर आणि राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून घटनास्थळी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
या आंदोलनाच्या माध्यमातून ‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी भाजप युवा मोर्चाची ठाम भूमिका स्पष्ट करण्यात आली असून, राष्ट्रभावनेशी संबंधित विषयांवर लोकशाही मार्गाने आवाज उठवत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर, शहर सरचिटणीस चंद्रकांत केंगार, जिल्हा सरचिटणीस विवेक साळुंके, शहराध्यक्ष अभिषेक चिंचकर, सचिव संदीप केसकर, शुभम सूर्यवंशी, महेश नेटके, माया कुंटे, पंकज पवार, ऋग्वेद सातपुते, हर्षद जगदाळे, राज देशमाने, निलेश कांबळे, रागू चौधर आदी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध