Indian Army: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता; नियंत्रण रेषेजवळ लष्कराकडून सर्च ऑपरेशन
श्रीनगर: शेजारील राष्ट्र पाकिस्तान कायमच भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र भारतीय लष्कर अशा नापाक कारवायांना सडेतोड उत्तर देत असते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. मात्र याच दरम्यान काही महत्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या आखनूर सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या भागात काही दशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानुसार हे सर्च ऑपरेशन केले जात आहे.
नियंत्रण रेषेजवळ काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली. त्यानंतर लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच जोगीवन वनक्षेत्रात संशयास्पद हालचाली देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे भट्टल परिसरात लष्कराच्या अनेक तुकड्या शोध मोहीम राबवत आहे. या भागात काही दहशतवादी घुसल्याचा संशय भारतीय लष्कराला आहे.
शोधमोहीम अधिक वेगाने सुरू
भारतीय लष्कर या भागात अत्यंत वेगाने आणि सावधगिरीने शोध मोहीम राबवत आहे. त्यामुळे या परीसरासह संवेनदशील भागात भारतीय लष्कराने सुरक्षा वाढवली आहे. सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्यातरी कोणतीही संशयास्पद कृती लष्कराला आढळून आलेली नाही. मात्र सतर्कता पूर्ण बाळगली जात आहे. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. मागील वर्षी याच परिसरात लष्कराने दोन ते तीन दहशतवादी ठार केले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १५ तासात ३ दहशतवाद्यांना कठस्नान घालण्यात आलं आहे. एकीकडे सुरक्षादलांसोबत सोपोरमध्ये एका दहशतवादीला ठार करण्यात आलं असतानाच, किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. तर ४ जवान जखमी झाले आहेत. सुरक्षादलांना अनेक ठिकाणी नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.