Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu Kashmir Industry : काश्मिरात कंपन्या तिप्पट वाढल्या, 370 हटवल्यानंतर तेजी, पहलगाममुळे धक्का

गेल्या पाच वर्षात, जम्मू आणि काश्मीरमध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे येथे कार्यरत कंपन्यांची संख्या जवळजवळ तिप्पट वाढली आहे. मात्र आता युद्धाचं सावट आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 01, 2025 | 04:33 PM
काश्मिरात कंपन्या तिप्पट वाढल्या, 370 हटवल्यानंतर तेजी, पहलगाममुळे धक्का

काश्मिरात कंपन्या तिप्पट वाढल्या, 370 हटवल्यानंतर तेजी, पहलगाममुळे धक्का

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : गेल्या पाच वर्षात, जम्मू आणि काश्मीरमध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे येथे कार्यरत कंपन्यांची संख्या जवळजवळ तिप्पट वाढली. मात्र पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तान युद्धाची भीती नजीकच्या भविष्यात गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम करू शकते, असं तज्ज्ञांच मत आहे. भारतातील डोंगराळ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सध्या उत्तराखंड (12,946 कंपन्या) नंतर दुसऱ्या क्रमांकावर सक्रिय कंपन्या आहेत.

Asim Malik : जनरल असीम मलिक नक्की कोण आहे? पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने दिलीय NSA ची जबाबदारी

अलिकडच्या घटनांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील गुंतवणुकीच्या वातावरणाबद्दल काही चिंता असल्या तरी, केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की या प्रदेशाच्या दीर्घकालीन विकासाच्या शक्यता अजूनही मजबूत आहेत व यामुळेच आतापर्यंत अनेक कंपन्या येथे आकर्षित झाल्या आहेत. भविष्यात आर्थिक क्रियाकलापांना चालना देत राहतील, पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे भारतात व्यापक संतापाची लाट उसळली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या सततच्या विकास उपक्रमांमुळे आणि 2019 मध्ये कलम 370 रद्द झाल्यापासून, दहशतवादी घटनांमध्ये एकूण घट, नवीन प्रोत्साहन योजना आणि व्यावसायिक चिंता दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे अलिकडच्या वर्षांत गुंतवणूकदार जम्मू काश्मीरकडे आकर्षित झाले आहेत. तथापि, जम्मू काश्मीरमध्ये नवीन कंपनी नोंदणीची संख्या आर्थिक वर्ष 2025 मध्ये 1,380 पर्यंत कमी झाली, जी मागील वर्षी 1,433 होती आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये ही संख्या विक्रमी 1,756 होती.

अफगाणिस्तानातून जगातील सर्वांत महागड्या मसाल्याचा पुरवठा थांबल्यामुळे गेल्या चार दिवसांत उच्च दर्जाच्या केशरच्या किरकोळ किमती 10% पेक्षा जास्त वाढून जवळपास 5 लाख रुपये प्रति किलो इझाल्या आहेत. घाऊक बाजारात त्याची किंमत प्रति किलो 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही किंमत आता अंदाजे 50 ग्रॅम सोन्याइतकी आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाकिस्तानव कारवाई म्हणून सरकारने पाकिस्तानशी व्यापार करण्यासाठी एकमेव जमीनी मार्ग असलेली अटारी-वाघा सीमा बंद केली होती. पहलगाम हल्ल्यापूर्वी, उच्च दर्जाच्या केशरचे दर प्रति किलो 4.25 लाख ते 4.50 लाख रुपये होते. इराणी केशर काश्मिरी जातीपेक्षा स्वस्त आहे, परंतु त्याची किंमतही 5% ने वाढली आहे. उद्योगाच्या अंदाजानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 55 टन केशरची मागणी असते. काश्मीरमध्ये फक्त 6-7 टन उत्पादन होते, तर उर्वरित अफगाणिस्तान आणि इराणमधून आयात केले जाते.

सरकारचं प्रोत्साहन

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 2023 मध्ये झालेल्या असामान्य कढीनंतरच्या घसरणीचे वर्णन सामान्यीकरणाचा टप्पा म्हणून केले आणि अलीकडील आकडेवारी आकडेवारी अजूनही ऐतिहासिक सरासरीपेक्षा खूपच जास्त असल्याचे सागितले. ज्या कंपन्या आधीच बंद इराल्या आहेत, ज्या कंपन्या लिक्विडेशनच्या प्रक्रियेत आहेत किंवा ज्यांची नावे नोंदणीतून चगळण्यात येत आहेत त्यांना वगळून सरकार सक्रिय कंपन्यांची संख्या निश्चित करते. सध्या, जम्मू आणि काश्मीरमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपन्यांना अनेक प्रकारचे प्रोत्साहन दिले गेले आहे. यामध्ये भांडवली गुंतवणूक सहाय्य, खेळत्या भांडवल कर्जावरील व्याज अनुदान, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संबंधित प्रोत्साहनांचा समावेश आहे.

Mudasir Ahmad Sheikh : शहीद मुदासिर अहमद शेख नक्की कोण आहेत? आई पाकिस्तानची नागरिक की भारतीय? वाचा सविस्तर

उत्पादनावर परिणाम

खोऱ्यातील हवामानातील अनियमिततेमुळे केशर उत्पादनावरही परिणा झाला आहे.

पंपोरमध्ये अलीकडेच सुरू झालेल्या सिमेंट कारखान्यांमुळे या भागात केसर उत्पादनात घट झाली आहे.

सिमेंटची धुळ कोवळ्या केशर पुलांवर पडते, ज्यामुळे त्यांची गुणवता आणि प्रमाण दोन्हीवर परिणाम होतो.

पंपोर व्यतिरिक्त, श्रीनगरच्या आसपारसच्या बहगाम आणि जम्मूच्या किश्तवाड जिल्ह्यानही केशराची लागवड केली जाते.

काश्मीरमध्ये केशराच्या अनेक जाती

मोंग्रा हा सर्वांत गडद रंगाचा असतो आणि त्याला सर्वांत तीव्र सुगंध आणि चव असते.

लच्छा जातीमध्ये लाल आणि पिवळे दोन्ही भाग असतात.

जर्दा प्रकाराचा वापर फेस पंक, ब्युटी कीम आणि इतरवउत्पादनांमध्ये केला जातो.

एक ग्रॅम केसर मिळविण्यासाठी. सुमारे 160-180 फुलांमधून तंतू काढले जातात.

त्याची कापणी ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरू होते आणि एका महिन्यात संपते.

Web Title: Jammu kashmir industry increase after remove article 370 but setback after pahalgam attack latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • Business News
  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा
1

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र
2

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या
3

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?
4

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.