
दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. जंतर मंतरवर पोलिसी आणि विद्यार्थ्यांमध्ये अचानक संघर्ष सुरू झाला. विद्यार्थी आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. जंतर मंतर परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे, जंतरमंतर येणारे पाणी, अन्नपुरवठा खंडित करण्याता आला, याशिवाय दिल्लीत १८ मेट्रो स्टेशन्स देखील बंद करण्यात आले आहे. यावरून विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. या सर्व परिस्थितीबात आपण दिल्ली पोलिसांशी बोलणार असल्याचे सीजेपी प्रवक्ता सौरभ दास यांनी म्हटले आहे.
बातमी अपडेट होत आहे….