Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Voter Adhikar Yatra: राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा शेवटचा दिवस; तेजस्वी यादवांसह इंडिया आघाडीतील नेते पटनात दाखल

गांधी मैदानापासून सुरू होणारी ही पदयात्रा पटनातील उच्च न्यायालयात असलेल्या आंबेडकर पुतळ्याजवळ ४ किमी अंतरावर संपेल. या पदयात्रेला 'गांधी से आंबेडकर' असे नाव देण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 01, 2025 | 12:59 PM
Voter Adhikar Yatra: राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा शेवटचा दिवस; तेजस्वी यादवांसह इंडिया आघाडीतील नेते पटनात दाखल
Follow Us
Close
Follow Us:
  • राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा शेवटचा दिवस आहे
  • इंडिया आघाडीचे नेतेही पटनात दाखल
  • २३ जिल्ह्यांतून प्रवास करत ती आज पटनात दाखल

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरू झालेल्या मतदार अधिकार यात्रा आज (१ सष्टेंबर) बिहारची राजधानी पटना येथे संपत आहे. पटनातील गांधी मैदानात होणाऱ्या पदयात्रेसाठी राहुल गांधी विमानतळावरून निघाले, परंतु गांधी मैदानाच्या १ किमी आधीच त्यांचा ताफा जाममध्ये अडकला. पदयात्रेमुळे सध्या आर ब्लॉक ते जीपीओ गोलंबरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर जाम दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गांधी मैदानापासून सुरू होणारी ही पदयात्रा पटनातील उच्च न्यायालयात असलेल्या आंबेडकर पुतळ्याजवळ ४ किमी अंतरावर संपेल. या पदयात्रेला ‘गांधी से आंबेडकर’ असे नाव देण्यात आले आहे. राहुल गांधी दिल्लीहून पटनात दाखल झाले. त्यानंतर ते गांधी मैदानाकडे निघाले आहेत. दरम्यान, तेजस्वी त्यांच्या निवासस्थानावरून गांधी मैदानाकडे जात आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘लोकशाही आणि संविधान नष्ट करणाऱ्यांना योग्य उत्तर मिळेल.’

“शरद पवारांना हे उशीरा सुचलेलं शहाणपण…; मराठा आरक्षणावरुन जयकुमार गोरे यांनी लगावला टोला

कार्यकर्त्यांसह गांधी मैदानात जाणारे सीपीआय(एमएल) नेते दीपांकर भट्टाचार्य म्हणाले, ‘आज यात्रेचा शेवट आहे, पण तो फक्त एक थांबा आहे. मतदारांच्या हक्कांसाठी आमचा लढा सुरूच राहील.’ त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल, रेवंत रेड्डी, अशोक गेहलोत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार तसेच आय.एन.डी.आय. आघाडीतील सर्व घटक पक्षांचे मोठे नेते आजच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. पदयात्रेसाठी गांधी मैदानात एक व्यासपीठ उभारण्यात आले आहे. गांधी मैदानात महाआघाडीतील पक्षांच्या सुमारे २० हजार कार्यकर्त्यांची गर्दी आहे.

महाआघाडीची मतदान हक्क यात्रा आज गांधी मैदानात समारोपाला

महाआघाडीची मतदान हक्क यात्रा आज (१ सप्टेंबर) पटना येथे अंतिम टप्प्यात पोहोचली. या यात्रेला सकाळी १०:५० वाजता गांधी मैदान गेट क्रमांक १ पासून सुरुवात झाली. सुरुवातीला महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर नेत्यांनी एसपी वर्मा रोड, डाक बंगला चौक, कोतवाली पोलिस स्टेशन, आयकर गोलंबर, नेहरू पथ मार्गे आंबेडकर पुतळ्याजवळ प्रस्थान केले. गांधी मैदानात बांधलेल्या मुख्य स्टेज आणि पंडालमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून येथून महाआघाडीचे नेते जनतेला संबोधित करतील. डाक बंगला चौकाजवळही स्वतंत्र स्टेज उभारण्यात आले असून तेथेही सभा होण्याची शक्यता आहे.

उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स आले आहेत? मग ‘या’ पद्धतीने त्वचेवर लावा चंदन, त्वचा होईल मुलायम आणि सॉफ्ट

२३ जिल्ह्यांतून यात्रा

ही यात्रा १७ ऑगस्ट रोजी सासारामच्या बायडा मैदानातून सुरू झाली होती. तब्बल २३ जिल्ह्यांतून प्रवास करत ती आज पटना येथे पोहोचली आहे. प्रवासादरम्यान ३ दिवसांचा ब्रेक घेण्यात आला होता. यात्रेच्या उद्घाटनाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. त्यानंतर प्रियंका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांसह इंडिया आघाडीचे अनेक प्रमुख नेते यात्रेत सहभागी झाले.

भाजपचा खरा चेहरा उघड – तेजस्वी यादव

महाआघाडीच्या मतदार हक्क यात्रेच्या समारोपावेळी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तेजस्वी यादव म्हणाले की, “एक गोष्ट स्पष्ट आहे की, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता संपली आहे आणि भाजपचा खरा चेहरा उघडा पडला आहे. यावेळी जनता भाजपला बिहारमधून हाकलून लावण्यासाठी काम करेल आणि हा संदेश संपूर्ण देशात पोहोचेल. लोकशाही आणि संविधान नष्ट करणाऱ्यांना योग्य उत्तर मिळेल. या संपूर्ण प्रवासात एक मोठा जनसमुदाय आमच्यासोबत उभा राहिला. आम्हाला बिहारच्या जनतेचे आशीर्वाद आणि पाठिंबा मिळाला आहे. आम्ही सर्व जनतेचे आभारी आहोत.”

वोटर अधिकार यात्रेचा उद्देश

काँग्रेसच्या मते, मतदार हक्क यात्रेचा मुख्य उद्देश मतदार यादीतून नावे वगळण्याच्या कथित घटनांवर प्रकाश टाकणे हा होता.
-निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणे
-राष्ट्रीय व्यासपीठावर मत चोरीचे आरोप उपस्थित करणे
-नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारांबद्दल जागरूक करणे

राहुल गांधी आणि काँग्रेसने आरोप केला की, निवडणूक आयोगाकडून राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेमुळे लाखो वैध मतदारांची नावे वगळली जात आहेत. या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती, त्यानंतर ६५ लाख नावांची प्राथमिक यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या यात्रेच्या माध्यमातून  राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी १३०० किमी अंतर कापले. १५ दिवसांच्या या यात्रेत बिहारमधील २५ हून अधिक जिल्हे समाविष्ट होते. यामध्ये सासाराम, सुपौल, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपालगंज, नवादा, औरंगाबाद यासारख्या जिल्ह्यांचा समावेश होता. यात्रेदरम्यान सार्वजनिक सभा, पथसंचलन आणि नागरिक संवाद आयोजित करण्यात आले. लखीसराय आणि औरंगाबादमध्येही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

Web Title: Last day of rahul gandhis voter rights march india front leaders including tejashwi yadav arrive in patna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Congress-BJP Clashes: राजकारण तापणार! राहुल गांधींच्या त्या विधानानंतर काँग्रेस मुख्यालयावर हल्ला
1

Congress-BJP Clashes: राजकारण तापणार! राहुल गांधींच्या त्या विधानानंतर काँग्रेस मुख्यालयावर हल्ला

Rahul Gandhi Bihar: बिहारमध्ये राहुल गांधीचे ‘देसी पॉलिटिक्स’; काँग्रेसचा ३५ वर्षांचा वनवास संपवणार का?
2

Rahul Gandhi Bihar: बिहारमध्ये राहुल गांधीचे ‘देसी पॉलिटिक्स’; काँग्रेसचा ३५ वर्षांचा वनवास संपवणार का?

PM modi abused in darbhanga : कॉंग्रेसच्या सभेमधून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईवरुन शिवीगाळ? व्हिडिओ आला समोर
3

PM modi abused in darbhanga : कॉंग्रेसच्या सभेमधून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईवरुन शिवीगाळ? व्हिडिओ आला समोर

मारा..जोरात मारा..तोडून टाका; कॉंग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, राहुल गांधींची पोस्ट चर्चेत
4

मारा..जोरात मारा..तोडून टाका; कॉंग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, राहुल गांधींची पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.