Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपुरचे तुकडे होऊ देणार नाही; अमित शाह यांचे विरोधकांवर टीकास्त्र

मणिपूरमध्ये घुसखोरी करून येथील सामाजिक व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही. ही लढाई तुकडे करणारे विरुद्ध एकत्र ठेवणारे यांच्यातील आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी सोमवारी मणिपूर येथे केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 16, 2024 | 03:18 PM
मणिपुरचे तुकडे होऊ देणार नाही; अमित शाह यांचे विरोधकांवर टीकास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

इम्फाळ : मणिपूरमध्ये घुसखोरी करून येथील सामाजिक व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही. ही लढाई तुकडे करणारे विरुद्ध एकत्र ठेवणारे यांच्यातील आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर येथे केला.

मणिपूरमधील वांशिक हिंसाचारावरून विरोधी पक्ष भाजपवर टीका करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची सभा झाली. मणिपूरमध्ये शांतता कायम ठेवण्याचा निश्चय व्यक्त करताना शहा म्हणाले, मणिपूरमध्ये घुसखोरीचे अनेक प्रयत्न होत आहेत. याद्वारे येथील सामाजिक रचना बदलण्याचा डाव आहे. मात्र, अशा लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही.

सर्व समुदायांना विश्वासात घेऊन आणि राज्याचे तुकडे होऊ न देता मणिपूरमध्ये शांतता कायम राखणे, यालाच मोदी सरकारचे प्राधान्य आहे. आमचे मुख्यमंत्री बीरेन सिंह हे मोदींकडे कायम मागणी करत असतात. आंतरसीमा परवाना असल्याशिवाय मणिपूर एकसंध राहू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हा परवाना भाजपने मणिपूरला ताकद दिली आहे.

वांशिक संघर्षावरही भाष्य

मणिपूरमध्ये मागील वर्षी झालेल्या वांशिक संघर्षावरही अमित शाहा यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ईशान्य भारताचे नशीब बदलेल तेव्हाच भारताचे नशीब बदलेल. मी संघर्षाबद्दल संसदेतही बोललो आहे. हा संघर्ष मिटविण्यासाठी आम्ही हरप्रकारे प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांचाच परिणाम म्हणून परिस्थितीत सुधारणा होत आहे.

Web Title: Manipur will not be dismembered amit shahs criticism of opponents nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2024 | 03:18 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Manipur News
  • Manipur Violence

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast : अमित शहा अ‍ॅक्शन मोडमध्ये; दौरा रद्द करत घेतली ‘ही’ सीक्रेट मीटिंग
1

Delhi Bomb Blast : अमित शहा अ‍ॅक्शन मोडमध्ये; दौरा रद्द करत घेतली ‘ही’ सीक्रेट मीटिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.