Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकार स्थापनेपूर्वीच नीतीश कुमार यांच्या भाजपकडे ‘या’ अटी; अग्नीवीर योजना व UCC बाबत मोठी मागणी

तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्यासाठी नीतीश कुमार व  चंद्राबाबू नायडू यांची साथ भाजपला घ्यावी लागणार आहे. सरकार स्थापन करण्यापूर्वी नीतीश कुमार यांनी त्यांच्या अटी व मागण्या सांगितल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 06, 2024 | 02:22 PM
सरकार स्थापनेपूर्वीच नीतीश कुमार यांच्या भाजपकडे ‘या’ अटी; अग्नीवीर योजना व  UCC बाबत मोठी मागणी
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. मात्र या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अब की बार 400 पार असा नारा देणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे देशामध्ये एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी व नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार व  टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र सरकार स्थापनेपूर्वीच नीतीश कुमार भाजपला काही अटी घातल्या आहेत. त्याचबरोबर मोदी सरकारने घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत देखील त्यांनी मत मांडली आहेत. त्यामुळे सरकारस्थापनेपूर्वीच नीतीश कुमार व भाजपमध्ये राजकारणाला सुरुवात झाली आहे.

देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला. उत्तर प्रदेश व महाराष्ट्रामध्ये भाजपला अपेक्षित असे यश आलेले नाही. राम मंदिराचा मुद्द चर्चेमध्ये असताना देखील अयोध्येमध्ये भाजपला अपयश आले. त्याचबरोबर भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री देखील निवडणुकीमध्ये यश मिळवण्यास अपयशी ठरले. स्मृती इराणी यांना देखील पराभवाचा फटका बसला. जोरदार प्रचारानंतर देखील भाजपला सरकार बनवण्यासाठी इतरांच्या मदतीची गरज भासत आहे. यासाठी त्यांना जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार व  टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू मदत करणार आहेत. नीतीश कुमार यांच्याकडे 12 आणि चंद्राबाबू नायडूंकडे 16 खासदार आहेत. दोघांचे मिळून 28 खासदार होतात. त्यानंतर एनडीए सरकार जादूयी आकडा गाठून सरकार स्थापन करणार आहे.

तीन मोठ्या मंत्रिपदांची मागणी

मोदी सरकारकडून UCC अर्थात यूनिफॉर्म सिविल कोडबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र UCC साठी काही पक्षांची तक्रार असून काही जणांची समंती आहे. देशामध्ये जास्त पक्ष हे UCC बाबत सहमत नाही. दुसरीकडे, अग्निवीर योजनेबाबतही मतभेद आहेत. बहुतांश राजकीय पक्ष याला अनुकूल नाहीत. या दोघांबाबत केवळ भाजपच ठाम आहे. मात्र, नितीश यांनी वन नेशन वन इलेक्शनबाबत सहमती दाखवत त्याला संमती दिली आहे. त्यामुळे नितीश कुमारही सरकार स्थापनेपूर्वीच दबावाच्या राजकारणाखाली आपल्या जास्तीत जास्त मागण्या मांडत आहेत. नितीश यांनाही नव्या सरकारमध्ये तीन मोठी मंत्रिपदे हवी आहेत. यामध्ये रेल्वे मंत्रालय, कृषी मंत्रालय आणि वित्त मंत्रालये हवी आहेत,असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Nitish kumar demand before forming govermnet on agniveer ucc and demanding three ministry before modi government nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2024 | 02:22 PM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • Loksabha Elections Result 2024
  • Nitish Kumar
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
1

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
2

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
3

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…
4

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.