Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Train Hijack: पाकिस्तान पुन्हा बरळला! ‘ट्रेन हायजॅक’ प्रकरणावरून भारतावर गंभीर आरोप; म्हणाला, ‘हे सर्व षडयंत्र… ‘

बलुच बंडखोरांनी नागरिक, महिला आणि मुलांना सोडले.  तर पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी, गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आहे. बंडखोरांनी 214 जणांना ओलिस ठेवल्याचे समोर आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 12, 2025 | 02:42 PM
Train Hijack: पाकिस्तान पुन्हा बरळला! ‘ट्रेन हायजॅक’ प्रकरणावरून भारतावर  गंभीर आरोप; म्हणाला, ‘हे सर्व षडयंत्र… ‘
Follow Us
Close
Follow Us:

बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेस या रेल्वेचे अपहरण करून अनेक प्रवाशांना ओलीस धरले आहे. हा हल्ला बलुचिस्तानमधील बोलानच्या डोंगराळ भागात झाला असून, ओलिसांची सुटका करण्यासाठी सुरक्षा दलांकडून व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेवरून पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.

११ मार्च रोजी क्वेटाहून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस बोलानच्या डोंगराळ भागातील एका बोगद्यातून जात असताना आठ सशस्त्र दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला.  त्यानंतर ही ट्रेन हायजॅक केली. या घटनेवर पाकिस्तानने भारताविरुद्ध पुन्हा एकदा आरोपांचे सत्र सुरू केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी ट्रेन हायजॅकमध्ये भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

बलुच बंडखोरांनी नागरिक, महिला आणि मुलांना सोडले.  तर पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी, गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आहे. बंडखोरांनी 214 जणांना ओलिस ठेवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी बलुचिस्तानमधील रेल्वे अपहरण घटनेबाबत भारतावर निराधार आरोप केले आहेत.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी पाकिस्तानमधील एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला.  यावेळी या हल्ल्याच्या पाठीमागे भारताचा हात असून भारत अफगणिस्तानच्या मदतीने या हल्ल्यांना मदत करत आहे, असा आरोप त्यांनी केला. राणा सनाउल्लाह यांनी थेट आरोप करत म्हटले की, हे सर्व भारताचे षडयंत्र आहे. त्यांनी असा दावाही केला की बलुच बंडखोरांना अफगाणिस्तानात सुरक्षित आश्रय मिळत आहे.

ओलिसांच्या कुटुंबीयांच्या व्यथा

हल्ल्यानंतर अपहरण झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. एका पीडित कुटुंबाने माध्यमांसमोर आपली वेदना व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या चुलत भावाच्या वडिलांनी सकाळी आठ वाजता ट्रेनमधून फोन करून ते घरी परतत असल्याचे सांगितले होते. मात्र, रात्री अकरा वाजता त्यांचा शेवटचा कॉल आला आणि त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही.”

Jaffar Express Train Hijack: पीडितांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले ‘अकरा वाजता काकांनी शेवटचा कॉल केला आणि नंतर…

बीएलएने हल्ल्याची जबाबदारी घेतली

बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असून, यापूर्वीही त्यांनी पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. बीएलएच्या दहशतवाद्यांनी नोव्हेंबर महिन्यात क्वेटा रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Pakistan pm and government allegation to india about balochistan train hijack world marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • india
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला
1

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला

भारताचा चीनला दणका! स्वस्त स्टील आयातींवर लादले भारीभरकम टॅरिफ ; 3 वर्षे भरावा लागणार कर
2

भारताचा चीनला दणका! स्वस्त स्टील आयातींवर लादले भारीभरकम टॅरिफ ; 3 वर्षे भरावा लागणार कर

World Blitz Championship: एरिगेसीची कार्लसनवर मात! अर्जुनने पहिल्या दिवशी घेतली संयुक्त आघाडी
3

World Blitz Championship: एरिगेसीची कार्लसनवर मात! अर्जुनने पहिल्या दिवशी घेतली संयुक्त आघाडी

गुपचूप पार पडले असीम मुनीरच्या कन्येचे लग्न; पुतण्याच बनला जावई; जाणून घ्या कोण आहे अब्दुल रहमान?
4

गुपचूप पार पडले असीम मुनीरच्या कन्येचे लग्न; पुतण्याच बनला जावई; जाणून घ्या कोण आहे अब्दुल रहमान?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.