
Tarique Rahman becomes new Prime Minister of Bangladesh
तारिक रहमान यांनी मंगळवारी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. बांगलादेशात पुरुष पंतप्रधानाचा एक नवा अध्याय सुरु झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बांगलादेशात( Bangladesh) प्रचंड राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार पसरला होता. सध्या नव्या सरकारच्या स्थापनेने लोकांमध्ये देशात लोकशीहीची आशा निर्माण झाली आहे. ढाका येथील संसद संकुलात दक्षिण प्लासा येथे तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
बांगलादेशात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी १३ व्या संसदीय निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत प्रमुख लढत ही बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामीमध्ये होती. या निवडणुकीत रहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपीचा प्रचंड बुहमातंनी विजय झाला आहे. बीएनपीला २९७ जागांपैकी २०९ जागांवर बहुमत मिळाले. तर उरलेल्यटा ६८ जागांवर जमात-ए-इलस्मीने शिक्कामोर्तब केला. बांगलादेशात जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना (Sheikh Hasina) सरकार पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकशाही प्रक्रिया पार पडून नवे सरकार स्थापन झाले आहे.
तारिक रहमान यांच्या शपथविधीसाठी जगभरातील १३ देशांना आमंत्रिकत करण्यात आले होते. या ऐतिहासिक क्षणात भारताच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ढाक्याला पोहचले होते. तसेच भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याशिवाय, पाकिस्तान, तुर्की, चीन, सौदी अरेबिया, कतार, यूएई, ब्राझील, श्रीलंका, नेपाळ या देशांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
lतारिक रहमान यांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्वत:ला लोकशाही समर्थक नेता म्हणून सादर केले होते. यामुळे आता त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. बांगलादेशची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून ती सुरळित करणे, तसेच देशांतर्गत राजकारणात देखील अस्थिरता कमी करणे आवश्यक आहे. यामुळे रहमान यांच्या कायदा आणि सुव्यवस्थेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. त्याच्यासमोर देशात लोकशाही व्यवस्था पुनर्स्थापित करण्याचे मोठे आव्हान आहे.
Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट; बांगलादेशवर संताप व्यक्त