Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: ‘सिंधु जल करारा’चे उल्लंघन म्हणजे युद्धाची घोषणा; नाक दाबताच पाकिस्तान बरळला

भारताने काही महत्वाची पावले उचलल्यानंतर आज पाकिस्तान सरकारने देखील महत्वाची बैठक घेतली. भारतासाठी पाकिस्तानने हवाई बंदी केली आहे. व्यापार बंद केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2025 | 07:33 PM
Pahalgam Terror Attack: ‘सिंधु जल करारा’चे उल्लंघन म्हणजे युद्धाची घोषणा; नाक दाबताच पाकिस्तान बरळला
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारत सरकारने काही महत्वाची पावले उचलली आहे. भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. वाघा बॉर्डर बंद केली आहे. तर पाकिस्तानने देखील भारताच्या निर्णयांची कॉपी केल्याचे दिसून येत आहे.

भारताने काही महत्वाची पावले उचलल्यानंतर आज पाकिस्तान सरकारने देखील महत्वाची बैठक घेतली. भारतासाठी पाकिस्तानने हवाई बंदी केली आहे. व्यापार बंद केला आहे. आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते आहे. पाकिस्तानी पीएमओच्या निवेदनात सांगण्यात आले की, पाकिस्तान भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याच्या अधिकाराचा वापर करेल.  ज्यामध्ये शिमला कराराचा समावेश आहे. पाकिस्तानने भारतावर पाकिस्तानात दहशतवाद पसरवण्याचा आरोप केला.

सिंधु जल करार तोडणे म्हणजे युद्धाची घोषणा

सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या घोषणेला पाकिस्तान पूर्णपणे नकार देतो. पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की हा करार एक बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार आहे, ज्यामध्ये एकतर्फी स्थगिती आणण्याची कोणतीही तरतूद नाही. सिंधू जल करारांतर्गत पाण्याचा प्रवाह रोखण्याचा किंवा वळवण्याचा प्रकार म्हणजेच पाकिस्तानच्या हक्कांचे उल्लंघन करण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचा गुन्हा मानला जाईल, असा इशारा पाकिस्तानने भारताला दिला आहे.

‘सिंधु जल’ कराराला दिली स्थगिती

भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या आहेत. भारताने भारत-पाकिस्तान सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच १ मे पर्यंत वाघा बॉर्डर बंद राहणार आहे. तसेच भारतामधील पाकिस्तानचे उच्चयुक्तालय बंद करण्यात येणार आहे. पाकिस्तानी नागरिकांना या पुढे भारताचा व्हिसा मिळणार नाही. जे नागरिक व्हिसा घेऊन भारतात राहिले आहेत त्यांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Big Breaking: पहलगाम हल्ल्यावरून भारताने आवळल्या पाकच्या नाड्या; ‘सिंधु जल’ कराराला दिली स्थगिती

सरकारने घेतलेले नेमके निर्णय काय? 

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारत सरकार आक्रमक झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची अत्यंत महत्वाची बैठक घेतली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारताने १ मे पर्यन्त अटारी वाघा बॉर्डर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: Pakistan said stay for indua water treaty that means war anouncement after pahalgam terror attack news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • india
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • sindhu river

संबंधित बातम्या

US Russia Bill : अमेरिकेचा भारताला मोठा झटका? रशियाशी व्यापारावर 100 % टॅरिफची टांगती तलवार; काय होणार परिणाम?
1

US Russia Bill : अमेरिकेचा भारताला मोठा झटका? रशियाशी व्यापारावर 100 % टॅरिफची टांगती तलवार; काय होणार परिणाम?

IGI ची आर्थिक झेप कायम; पहिल्याच तिमाहीत दमदार कामगिरी; महसुलात 23% तर नफ्यात 31% वाढ
2

IGI ची आर्थिक झेप कायम; पहिल्याच तिमाहीत दमदार कामगिरी; महसुलात 23% तर नफ्यात 31% वाढ

या १० मोटरसायकल ज्या होतील २०२६ च्या शेवटच्या ५ महिन्यात! पहा कोणत्या असतील या बाईक
3

या १० मोटरसायकल ज्या होतील २०२६ च्या शेवटच्या ५ महिन्यात! पहा कोणत्या असतील या बाईक

India Snack Market: ईमामी अ‍ॅग्रोटेकचे स्नॅकिंग क्षेत्रात दमदार पदार्पण; WeMe ब्रँडसाठी 750 कोटींची गुंतवणूक
4

India Snack Market: ईमामी अ‍ॅग्रोटेकचे स्नॅकिंग क्षेत्रात दमदार पदार्पण; WeMe ब्रँडसाठी 750 कोटींची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.