
७ जणांना घेऊन जाणारे पवन हंस हेलिकॉप्टर अंदमान समुद्रात कोसळले
झारखंडच्या रांची येथून दिल्लीच्या दिशेला निघालेल्या एअर एम्ब्युलन्सचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. झारखंडच्या चतरा इथे हा अपघात झाल्याची माहिती आहे. हा अपघाता होत नाही तोपर्यंत मंगळवारी सकाळी अंदमान बेटांवर पवन हंस हेलिकॉप्टर कोसळले. उड्डाणानंतर काही वेळातच ते समुद्रात कोसळल्याची घटना घडली. या हेलिकॉप्टरमध्ये सात जण होते आणि त्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर अंदमान समुद्रात क्रॅश-लँडिंग करण्यास भाग पाडल्याची माहिती मिळाली. वैमानिकाने सावधगिरी दाखवत क्रॅश-लँडिंग करण्यात यशस्वी झाला. दोन क्रू मेंबर्ससह सात जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
बचाव पथके ताबडतोब घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी क्रू आणि प्रवाशांना बाहेर काढले. अहवालात असे म्हटले आहे की हेलिकॉप्टर पोर्ट ब्लेअरहून मायाबंदरला जात होते. उड्डाणानंतरच पायलटला तांत्रिक बिघाडाची जाणीव झाली. अशा परिस्थितीत, समुद्रात क्रॅश-लँडिंगचा पर्याय होता. पवन हंसच्या प्रवक्त्याने सांगितले की ही घटना सकाळी ९:३० च्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरने शॉर्ट लँडिंग केले. प्रवासी आणि क्रू मेंबर्सना किरकोळ दुखापत झाली, परंतु कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
पवन हंस ही देशातील सर्वात मोठी सरकारी मालकीची हेलिकॉप्टर कंपनी आहे. तिचे हेलिकॉप्टर दुर्गम भागात जाण्यासाठी वापरले जातात. अगदी प्रसिद्ध राजकारणी देखील पवन हंसच्या सेवांचा वापर करतात. ही कंपनी १९८५ मध्ये स्थापन झाली. देशातील दुर्गम भागांना जोडणे हे तिचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अॅम्ब्युलन्स सोमवारी झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील सिमरिया पोलिस स्टेशनच्या खासियातु करम तांड जंगलात कोसळली. त्यात सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन वैमानिक, एक डॉक्टर, एक परिचारिका, एक रुग्ण आणि त्यांचे दोन सहकारी यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, बीचक्राफ्ट (BE9L) VTAJV विमान रांचीहून दिल्लीसाठी उड्डाण केले होते, परंतु टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच संपर्क तुटला.
गेल्या महिन्याच्या २८ तारखेला बारामती येथे विमान अपघात झाला, ज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वैमानिकांचा मृत्यू झाला. या अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेमागे कटाचा वास येत असल्याने या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.