Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Mann Ki Baat’मध्ये पंतप्रधान मोदींचा कारगिल वीरांना सलाम; अजून कोणते 5 मुद्दे मांडले जाणून घ्या…

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याचा गौरव करत पाणी संवर्धन, भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावरील कामगिरी, क्रीडा क्षेत्रातील यश

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 26, 2026 | 01:36 PM
Pm Modi Man ki Baat News (Photoसौजन्य-सौशलमीडिया)

Pm Modi Man ki Baat News (Photoसौजन्य-सौशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली.
  • पाणी संवर्धन, क्रीडा आणि अंतराळ संशोधनावर विशेष भर.
  • भारतीय विद्यार्थ्यांच्या जागतिक यशाचे कौतुक करत राष्ट्रनिर्माणाचे आवाहन.
Pm Modi Man ki Baat News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कारगिल विजय दिनाचे महत्त्व अधोरेखित करत देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर पाण्याचे संवर्धन, भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावरील कामगिरी, क्रीडा क्षेत्रातील यश आणि अंतराळ संशोधनातील नव्या संधी अशा अनेक विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले.

कारगिल युद्धाबाबात मोदीचे वक्तव्य…

भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी म्हणाले की, काही तारखा अशा असतात ज्या प्रत्येक भारतीयांच्या मनात कोरल्या जातात. 26 जुलै हा त्यापैंकी एक आहे. कारगिल युद्धात भारतीय जवानांनी दाखवलेले धैर्य आणि त्याग देश कधीही विसरता येणार नाही. या शूर सैनिकांमुळेच देशाचे मस्तक अभिमानाने उंच राहिले आहे, असे त्यांनी सांगितले.(Mann Ki Baat:)

जलसंधारणाच्या उपक्रमांचे कौतुक

पाण्याच्या प्रश्नावर बोलताना पंतप्रधानांनी देशभर सुरू असलेल्या जलसंधारणाच्या उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, आता पावसाचे पाणी साठवण्याचा विचार केवळ सरकारी योजनेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो लोकांचा सहभाग असलेली चळवळ बनत आहे. अनेक राज्यांमध्ये गावकऱ्यांनी तलाव, विहिरी आणि जलसाठे नव्याने विकसित करून पाण्याची समस्या कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा प्रयत्नांमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंदोलन संपताच दिल्ली मेट्रोची मोठी घोषणा; 3 स्थानके पुन्हा सुरू, 15 अद्याप बंद

विज्ञान स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीचाही मोदींनी विशेष उल्लेख

भारतीय विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय विज्ञान स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीचाही मोदींनी विशेष उल्लेख केला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांतील जागतिक ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कठोर मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर भारतीय युवक जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पहिले खासगी रॉकेट हे त्याचे उत्तम उदाहरण

अंतराळ क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत असल्याचे सांगताना मोदी यांनी खासगी कंपन्यांच्या सहभागाचेही कौतुक केले. भारतातील तरुण संशोधक आणि स्टार्टअप्स आता नवीन तंत्रज्ञान विकसित करत असून, देशाचे पहिले खासगी रॉकेट हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अंतराळ संशोधनात भारताची भूमिका आणखी मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय क्रीडा इतिहासात नवा अध्याय

क्रीडा क्षेत्रातील यशाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यामुळे जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे, असे त्यांनी सांगितले. विशेषतः बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावून भारतीय क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला संघाने मिळवलेला कसोटी विजय

महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचाही त्यांनी गौरव केला. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिला संघाने मिळवलेला कसोटी विजय हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण संघाचे कौतुक केले. महिलांची वाढती कामगिरी देशातील नव्या पिढीला प्रेरणा देणारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अनोख्या शैक्षणिक प्रयोगाचाही उल्लेख

कार्यक्रमाच्या शेवटी मोदी यांनी केरळमधील एका शाळेतील अनोख्या शैक्षणिक प्रयोगाचाही उल्लेख केला. विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा खेळाच्या माध्यमातून शिकवण्याचा हा उपक्रम अभिनव असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण अधिक रंजक करण्यासाठी अशा कल्पनांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, पुढील काही तासांत…

आपल्या घरावर तिरंगा फडकवावा

याशिवाय आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहनही त्यांनी केले. देशप्रेमाची भावना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत उत्साहाने सहभागी व्हावे, तसेच विविध राष्ट्रीय उपक्रमांबाबत आपले विचार मांडावेत, असे सांगत त्यांनी आपल्या संवादाचा समारोप केला.

Web Title: Pm modi mann ki baat kargil tribute rain campaign science success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • maharashtra news
  • PM Modi

संबंधित बातम्या

तांत्रिक निकष रद्द करा; पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच 1068 कोटींचा विमा द्या; मुख्यमंत्र्यांकडे आमदार कैलास पाटील यांची मागणी
1

तांत्रिक निकष रद्द करा; पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच 1068 कोटींचा विमा द्या; मुख्यमंत्र्यांकडे आमदार कैलास पाटील यांची मागणी

Jalgaon News: स्वच्छतेचा वसा, हरिततेचा ध्यास! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम
2

Jalgaon News: स्वच्छतेचा वसा, हरिततेचा ध्यास! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम

Jalgaon News: गैरवर्तन पडलं महागात! पोलिस अधीक्षकांनी उचललं कठोर पाऊल
3

Jalgaon News: गैरवर्तन पडलं महागात! पोलिस अधीक्षकांनी उचललं कठोर पाऊल

Thane News: ‘मृत्यूच्या दारातून परतला’ 52 वर्षीय मालाडकराला ठाण्यातील डॉक्टरांनी दिलं नवजीवन
4

Thane News: ‘मृत्यूच्या दारातून परतला’ 52 वर्षीय मालाडकराला ठाण्यातील डॉक्टरांनी दिलं नवजीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.