लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला घोषित होणार आहे. याचदरम्यान सर्व राजकीय पक्ष आपल्याच जागा जिंकणार असल्याचा दावा करतांना दिसत आहे. तर राजकीय नेते वृत्त माध्यमांना मुलाखतीतून आपली भूमिका मांडतांना दिसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आहे.
या मुलाखती दरम्यान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, महात्मा गांधींवर पहिला चित्रपट तयार झाला तेव्हा जगभर गांधींबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. यापूर्वी त्यांना कोणी ओळखत नव्हते. गांधींचे विचार जगभर पोहोचवण्यासाठी गेल्या 75 वर्षांत आपण काहीही केले नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “महात्मा गांधी हे महान व्यक्तिमत्व होते. आपण जगभर त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. जेव्हा महात्मा गांधींचा पहिला चित्रपट बनला तेव्हा जगात गांधी कोण? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण गेल्या 75 वर्षात काहीही केले नाही,” अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी दिली.
अनेक समस्यांवर गांधीजींचे विचार
मार्टिन ल्यूथर किंग आणि नॅन्सन मंडेला यांना जगभरात ओळखले जाते. मात्र गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरले आहे. फक्त, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, पण ती मिळाली नाही. आज गांधी जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावलम आहे. असेही मोदीजी म्हणाले.