Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court Decision: विधानसभेने पारित केलेली विधेयके राज्यपाल थांबवू शकत नाहीत, पण…; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

केरळमध्ये सुमारे ८ विधेयके रखडलेली आहेत. यात सहकारी संस्था, लोकायुक्त आणि केंद्रीय कायद्यांशी संबंधित दुरुस्ती विधेयकांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 21, 2025 | 12:07 PM
निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज

निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रपती आणि राज्यपालांविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी
  • राज्यपाल–राज्य सरकार यांच्यातील वाद
  • अंतिम मुदती निश्चित करता येत नाहीत
Delhi News :  सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीसाठी अंतिम मुदत निश्चित करण्याबाबत दाखल याचिकांवर गुरुवारी निर्णय दिला. राज्यपालांना विधानसभा मंजूर विधेयकांवर व्हेटो करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा समज चुकीचा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने सांगितले की राज्यपालांकडे विधेयकावरील निर्णयासाठी तीनच पर्याय आहेत — मान्यता देणे, पुनर्विचारासाठी विधानसभा परत पाठवणे किंवा विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवणे. विधेयक मंजुरीसाठी कोणतीही ठोस अंतिम मुदत बंधनकारक करता येत नसली, तरी अनावश्यक विलंब झाल्यास सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकते, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

ही सुनावणी तामिळनाडूतील राज्यपाल–राज्य सरकार यांच्यातील वादातून सुरू झाली. राज्यपालांनी काही सरकारी विधेयके दीर्घकाळ प्रलंबित ठेवल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने ८ एप्रिल रोजी राज्यपालांना व्हेटोचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.

त्याच निर्णयात, राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी तीन महिन्यांत निर्णय देणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले होते. हा आदेश ११ एप्रिल रोजी जारी झाला. त्यानंतर राष्ट्रपतींकडून सर्वोच्च न्यायालयाचे मत मागवण्यात आले होते आणि या संदर्भात १४ प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी तब्बल आठ महिने सुरू होती.

५ राज्यांमध्ये ४२ विधेयके मंजुरीअभावी प्रलंबित

देशातील पाच राज्यांमध्ये तब्बल ४२ विधेयके राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये महत्त्वाची विधेयके अडकून पडल्याने प्रशासकीय कार्यप्रणालीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

तामिळनाडू
राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या १० विधेयकांवरून निर्माण झालेल्या वादानंतर ही विधेयके २०२३ मध्ये राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली. त्यापैकी एकाला मंजुरी मिळाली, सात विधेयके फेटाळण्यात आली, तर दोन विधेयके अद्याप प्रलंबित आहेत.

पश्चिम बंगाल
सभापती बिमन बॅनर्जी यांच्या माहितीनुसार, १९ विधेयके राज्यपालांकडे प्रलंबित आहेत.

कर्नाटक
कर्नाटकातील १० विधेयके सध्या राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत. यामध्ये मुस्लिमांसाठी ४% कंत्राटी आरक्षण, तसेच मंदिरांवरील कर आकारणीसंबंधी दुरुस्ती विधेयकांचा समावेश आहे. राज्यपालांकडे मात्र कोणतेही विधेयक प्रलंबित नाही.

तेलंगणा
मागासवर्गीय कोट्यासंदर्भातील ३ विधेयके राष्ट्रपतींकडे अडकून आहेत. तसेच, मोहम्मद अझरुद्दीन यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचा प्रस्तावही ऑगस्टपासून प्रलंबित आहे.

केरळ
केरळमध्ये सुमारे ८ विधेयके रखडलेली आहेत. यात सहकारी संस्था, लोकायुक्त आणि केंद्रीय कायद्यांशी संबंधित दुरुस्ती विधेयकांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत : ‘अंतिम मुदती निश्चित करता येत नाहीत’

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने एकमताने स्पष्ट केले की राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना विधेयक मंजुरीसाठी अंतिम मुदत घालणे शक्य नाही. तसेच, ‘मानली जाणारी मान्यता’ (Deemed Assent) देणेही न्यायालयाच्या अधिकारात नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

न्यायालयाने राज्यपालांकडे तीनच घटनात्मक पर्याय असल्याचे म्हटले आहे. यात विधेयकाला मंजुरी देणे, पुनर्विचारासाठी विधानसभेकडे परत पाठवणे, राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवणे हे तीनच पर्याय आहेत. कलम २०० आणि २०१ नुसार, राज्यपालांना निर्णय घेताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचे बंधन नाही. विधेयकांवर दीर्घकाळ, अन्याय्य किंवा अनिश्चित विलंब झाल्यास न्यायालय मर्यादित हस्तक्षेप करू शकते. मात्र, राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या मान्यतेवर थेट न्यायालयीन पुनरावलोकन लागू होणार नाही. राज्यपाल हे फक्त रबर स्टॅम्प नाहीत. असंही न्यायालयाने नमुद केलं आहे.

सुनावणीची पार्श्वभूमी

या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खंडपीठात न्यायमूर्ती सूर्यकांत, विक्रम नाथ, पी. एस. नरसिंह आणि ए. एस. चंद्रचूडकर यांचा समावेश होता. सुनावणी १९ ऑगस्टपासून सुरू होती. अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्राची बाजू मांडली, तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या विरोधी पक्षशासित राज्यांनी केंद्राच्या भूमिकेला विरोध केला.

 

Web Title: State government governor conflict governor cannot stop bills passed by the legislative assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • State Governments
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
1

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

‘5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षही त्यांचाच होणार का?’; देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात थेट सवाल, ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद
2

‘5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षही त्यांचाच होणार का?’; देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात थेट सवाल, ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद

Supreme Court News: मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बाहेर काढण्याचा पालकांना अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3

Supreme Court News: मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बाहेर काढण्याचा पालकांना अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court : कोण आहेत कोस्ट गार्डच्या साहसी अधिकारी प्रियंका त्यागी? ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला!
4

Supreme Court : कोण आहेत कोस्ट गार्डच्या साहसी अधिकारी प्रियंका त्यागी? ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.