Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan War : युद्धबंदीच्या घोषणेनंतरही भारत-पाकिस्तानमध्ये तणाव कायम; हजारो नागरिकांचे झाले स्थलांतर

आतापर्यंत राजौरी आणि पूंछच्या सीमावर्ती भागातून 8 ते 10 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना मदत छावण्यांमध्ये अन्न, पाणी, औषधे आणि राहण्याची सुविधा पुरविली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 11, 2025 | 08:07 AM
India-Pakistan War : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव कायम; पाच हजार नागरिकांचे झाले स्थलांतर

India-Pakistan War : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव कायम; पाच हजार नागरिकांचे झाले स्थलांतर

Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कायम असलेल्या तणावामुळे जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या गोळीबार आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, जम्मू प्रदेशातील किमान पाच जिल्ह्यांतील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी आणि मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. या गोळीबारात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 60 जण जखमी झाले आहेत.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी आणि मंत्री सतीश शर्मा यांच्यासह, जम्मू, राजौरी आणि सांबा जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या मदत छावण्यांना भेट दिली. त्यांनी विस्थापित लोकांना भेटले, त्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांना आश्वासन दिले की सरकार त्यांच्या प्रत्येक गरजांची काळजी घेत आहे.

आतापर्यंत राजौरी आणि पूंछच्या सीमावर्ती भागातून 8 ते 10 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना मदत छावण्यांमध्ये अन्न, पाणी, औषधे आणि राहण्याची सुविधा पुरविली जात आहे. सर्व अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात आहेत आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे, अशी माहिती मंत्री सतीश शर्मा यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची मदत केंद्रांना भेट

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मिश्रीवाला, नागबानी, बिश्नाह आणि थंडी खुई येथील मदत केंद्रांना भेट दिली आणि अधिकाऱ्यांना पूर्ण सतर्क राहण्याचे निर्देश दिले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जम्मू आणि आसपासच्या भागातील लोकांना घरातच राहण्याचे आणि अनावश्यकपणे रस्त्यावर न येण्याचे आवाहन केले.

चीनचा पाकिस्तानला पाठिंबा

पाकिस्तानकडून केले जात असलेल्या भ्याड हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने शनिवारी पहाटे पाकिस्तानातील सहा प्रमुख लष्करी हवाई तळांवर शक्तिशाली स्फोटाने उडवले. यात पाकिस्तानी लष्करी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव वाढत आहेत. असे असतानाच चीनने भारताविरोधी भूमिका घेत पाकिस्तानला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Tensions remain high between india and pakistan despite the declaration of ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 08:07 AM

Topics:  

  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war
  • indian army
  • Indo-Pak Relation

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Pakistani Terrorism: पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद का थांबू शकत नाहीत; काय आहे खरे कारण?
2

Pakistani Terrorism: पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद का थांबू शकत नाहीत; काय आहे खरे कारण?

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान
3

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे
4

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.