Malegaon Bomb Blast: मालेगाब बॉम्ब स्फोट प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणावर भाष्य केले आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 2008 साली रमजानच्या आदल्या भिक्कू चौकामध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला. नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर 100हून अधिक लोक जखमी झाले होते. तर योगी आदित्यनाथ काय म्हणाले हे, जाणून घेऊयात.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षांसारखे पक्ष राष्ट्रप्रेमी लोकांना कायमच अडकवण्याचा कट रचतात. मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात निष्पाप हिंदूंना गोवण्यात आले. तर दहशतवाद्यांना वाचवण्यात आले. आज तेच लोक देशातील संविधानिक यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र योगी आदित्यनाथ यांनी आज मेरठ येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीका केली आहे. सपा आणि काँग्रेसचे राजकारण हे केवळ जातीयवाद, दंगली आणि माफियांची पूजा करण्यापुरते मर्यादित आहे. योगी आदित्यनाथ यांनी मालेगाव बॉम्ब प्रकणावरून सपा आणि काँग्रेसवर टीका केली आहे. मालेगाव घटनेत निष्पाप हिंदूंना अडकवून राष्ट्रप्रेमी नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाबाबत त्यांचे मवाळ धोरण, जातीच्या आधारावर समाजचे विभाजन करण्याची त्यांची रणनीती देशासाठी घातक आहे.
Malgeaon Bomb Blast: ‘मोदी-योगींचे नाव घ्या…’ साध्वीचे खळबळजनक खुलासे; तुरुंगातील अत्याचारावर केले भाष्य
प्रज्ञा सिंह यांचा दावा काय?
माझ्यावर नरेंद्र मोदी, मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव यांची नावे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मी जर यांचे नाव घेतले तर ते मला मारणार नाहीत असे ते मला सांगत होते. माझ्याकडून त्यांची नावे वदवून घेण्यासाठी मला त्रास दिला जात होता. मला ते खोटे बोलण्यास सांगत होते. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, माझा तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. कठोर छळ करून त्यांना हवे तसे त्यांनी मला बोलायला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मी खोटे बोलले नाही.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
साध्वी प्रज्ञा यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मालेगाव प्रकरणात मोहन भागवतांचे नाव घेण्यासाठी दबाव असल्याचे म्हटले होते. साध्वी प्रज्ञा यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे नाव घ्यावे, यासाठी त्यांना त्रास दिला. त्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तत्कालीन सरकार आणि काँग्रेस पक्ष हिंदुत्वाच्या विरोधात हिंदुत्वाचा अपमान करून मतांच्या राजकारणासाठी कोणत्याही ठरला जाऊ शकतात.