Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूर अजूनही पेटलेलेच; सुरक्षा दलावर हल्ला, भाजप नेत्यांची घरंही सोडली नाहीत; अशी आहे सद्यस्थिती…

जातीय हिंसाचाराच्या (Communal Violence) आगीत होरपळत असलेल्या मणिपुरात इम्फाळ पश्चिमेतील इरिंगबाम पोलिस ठाण्यावर सुमारे 500 जणांच्या जमावाने हल्ला केला. याठिकाणी शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा दलांनी जमावाला (Manipur Violence) पळवून लावले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2023 | 07:41 AM
मणिपूर अजूनही पेटलेलेच; सुरक्षा दलावर हल्ला, भाजप नेत्यांची घरंही सोडली नाहीत; अशी आहे सद्यस्थिती…
Follow Us
Close
Follow Us:

इम्फाळ : जातीय हिंसाचाराच्या (Communal Violence) आगीत होरपळत असलेल्या मणिपुरात इम्फाळ पश्चिमेतील इरिंगबाम पोलिस ठाण्यावर सुमारे 500 जणांच्या जमावाने हल्ला केला. याठिकाणी शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा दलांनी जमावाला (Manipur Violence) पळवून लावले. तर दुसऱ्या एका घटनेत भाजप आमदार विश्वजित यांच्या घराची जाळपोळ करण्याचा जमावाचा प्रयत्न करण्यात आला.

मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्स टीमने (Manipur Rapid Action Team) तो प्रयत्न हाणून पाडला. तिसरी घटना सिंजेमाईची आहे. इथे जमावाने भाजप कार्यालयाला घेराव घातला. मात्र, लष्कराच्या जवानांनी गर्दी पांगवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारोंच्या संख्येत असलेल्या जमावाने महाल परिसरातील इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करत रबरी गोळ्याही झाडल्या.

सुरक्षा दलावर हल्ला

विष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा आणि चुराचांदपूर जिल्ह्यातील कांगवई येथे शनिवारी सकाळी गोळीबाराच्या घटना घडल्या. जमावाने अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळही केली.

राज्यात लिबिया, सिरियासारखी स्थिती

सध्या मणिपूर राज्य हिंसक होत आहे. कोणीही कोणाचेही आयुष्य, मालमत्ता कधीही संपवू शकतो. जसे लिबिया, लेबनॉन, नायजेरिया, सीरियामध्ये घडत आहे तसेच. असे वाटते की मणिपूरला त्याच्या परिस्थितीवर सोडून दिले आहे.

– निशिकांत सिंह, निवृत्त लेफ्टनंट जनरल

मणिपूरमध्ये कुणाचे नियंत्रण आहे केंद्राचे की राज्याचे हा प्रश्न लोक विचारत आहेत. कोण प्रभारी आहे हे स्पष्ट व्हायला हवे अन्यथा स्थिती जैसे थे राहील. मणिपूरमध्ये कलम 355 लागू आहे. त्यामुळे येथील लोकांची सुरक्षा करणे राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु हिंसा रोखण्यासाठी कुठलीही योजना बनवली जात नाही. सध्या परिस्थिती सुधारेल अशी चिन्हे नाहीत. राज्यातील सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे.

– वाय. जॉयकुमार सिंह, उपाध्यक्ष एनपीपी

Web Title: Violence is still exist in manipur mob attacking on bjp leader houses nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2023 | 07:41 AM

Topics:  

  • Communal Violence
  • Manipur Violence
  • Manipur Violence News
  • Violence in Manipur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.