Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election Scam: सहा महिन्यांत 47 लाख मतदारांचा फरक कुठून आला? विरोधकांचा EC ला थेट सवाल

राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र निवडणुकीतील मतदानाबाबत त्यांची शंका व्यक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाची भेट घेतली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 04, 2024 | 11:41 AM
Maharashtra Election Scam: सहा महिन्यांत 47 लाख मतदारांचा फरक कुठून आला? विरोधकांचा EC ला थेट सवाल
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुती आणि भाजपच्या प्रचंड बहुमताने दणदणीत विजय झाला. पण राज्यातीलच नव्हे तर देशभरातील अनेक राजकीय तज्ज्ञांनी या निवडणुकीत काहीतरी घोळटा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विरोधकांकडून इव्हीएम मशिन्सबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने इव्हीएम घोटाळ्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर आता थेट सर्वसामान्य नागरिकांकडूनही मतदानांत अनियमितता झाल्याचा आरोप केला जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी भाजपवर निशाणा साधत महायुतीचे सरकार जनतेच्या मतांमुळे नव्हे तर दिल्लीत बसलेल्या भाजपच्या अदृश्य शक्तीमुळे जिंकल्याचा आरोप केला आहे. हे सरकार जनतेच्या मतांनी आलेले नाही. दिल्लीत बसलेल्या भाजपच्या लोकांमुळे  झाले. त्यांना लोकांची पर्वा नाही. आम्ही आज निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि ते काय निर्णय घेतात ते पाहू, असही त्यांनी यावेळी म्हटलंय.

Maharashtra CM: भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय! अखेर देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

47 लाख नवीन मतदार

तत्पूर्वी, राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र निवडणुकीतील मतदानाबाबत त्यांची शंका व्यक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाची भेट घेतली. यानंतर, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान सुमारे 47 लाख मतदारांची नावे यादीत जोडल्याचा आरोप केला. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “निवडणुका योग्य पद्धतीने न घेतल्यास राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचे नुकसान होते. निवडणूक आयोगाने डेटा काढावा आणि आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तथ्ये प्रदान करावीत, ज्याच्या आधारे आम्हाला  निष्कर्ष काढता येईल.

सिंघवी पुढे म्हणाले, “आमचा पहिला मुद्दा महाराष्ट्रातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात हटवण्याबाबत होता. या प्रक्रियेसाठी विहित फॉर्म आणि प्रक्रियांचे पालन केले जावे,  अशा प्रकारे मतदारांची नावे  हटवण्याचा आधार समजून घेण्यासाठी आम्हाला बूथ आणि मतदारसंघानुसार तपशीलवार डेटा आवश्यक आहे. हा डेटा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नावे कशाच्या आधारे हटवण्यात आली हे शोधण्यासाठी आम्हाला मदत होईल.”

International Cheetah Day : आजपासून ‘वायू’ आणि ‘अग्नी’ला कुनोच्या जंगलात करता

“आमचा दुसरा मुद्दा मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याचा होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान सुमारे पाच महिन्यांत सुमारे 47 लाख मतदारांची नावे जोडण्यात आल्याचे आम्हाला आढळले. ही नावे जोडण्यासाठी फॉर्म कुठे आहेत? घरोघरी जाऊन पडताळणी कशाच्या आधारावर करण्यात आली?  याचाही आम्हाला कच्चा डेटा हवा असल्याची मागणी मनुसिंघवी यांनी केली.  मतदानातील सात टक्के फरकाकडेही काँग्रेस नेत्याने लक्ष वेधले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 25,000 किंवा त्याहून अधिक मतांची वाढ झालेले 118 मतदारसंघ आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने दणदणीत विजय मिळवला.

Web Title: Where did the difference of 47 lakh voters come from in six months the opposition directly questions the ec nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 11:41 AM

Topics:  

  • EVM Scam
  • loksabha election 2024
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
1

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले
2

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले

Nagpur Politics: महायुती तुटली; मविआ फुटली नागपुरात शिंदेसेना स्वबळावर, तर भाजपचे ‘वेट अॅण्ड वॉच’
3

Nagpur Politics: महायुती तुटली; मविआ फुटली नागपुरात शिंदेसेना स्वबळावर, तर भाजपचे ‘वेट अॅण्ड वॉच’

“सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर…”: महायुती फुटणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ
4

“सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर…”: महायुती फुटणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.