Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu-Kashmir News: जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा का देऊ नये? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

राज्याचा दर्जा देण्यासाठी, नवीन कायदेशीर बदलांना लोकसभा आणि राज्यसभेने मान्यता द्यावी लागेल, म्हणजेच प्रस्ताव संसदेने मंजूर करावा लागेल. मंजुरीनंतर, तो राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 10, 2025 | 02:33 PM
Jammu-Kashmir News:

Jammu-Kashmir News:

Follow Us
Close
Follow Us:
  • जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा का देऊ नये- न्यायालयाचा सवाल
  • उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारला चार आठवड्यांचा वेळ
  • राज्याची सुरक्षा आणि लोकशाही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू
Supreme Court on Jammu-Kashmir News: जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. या मागणीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारला ‘जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा का देऊ नये?’ असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी न्यायालयाने सरकारला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे.

मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने अनेक याचिकांवर सुनावणी करताना ही नोटीस बजावली आहे. या याचिकाकर्त्यांमध्ये झहूर अहमद भट आणि राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते अहमद मलिक यांचा समावेश आहे.

Bihar Elections 2025 : चिराग पासवान का वाढवत आहेत जागा वाटपाचा गुंता? बिहारमध्ये भाजपला फोडला घाम

याचिकाकर्त्यांनी या याचिकांच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा देण्याची मागणी आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी डिसेंबर २०२३ च्या न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला. यात जम्मू आणि कश्मीरमधून हटवण्यात आलेले कलम ३७० चा निर्णय कायम ठेवण्यात आला होता.इतकेच नव्हे तर जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा असे रेकॉर्डवर नमूद करण्यात आले होते.

यासंदर्भात केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यासाठी वेळ लागणार असू यासंदर्भात अद्यापही चर्चाच सुरू आहेत. मेहता म्हणाले, “हा एक वेगळा मुद्दा आहे आणि त्यावर सविस्तर चर्चा सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यापूर्वी अनेक पैलूंचा विचार करावा लागणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.”

तसेच, काही व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या धारणांवर आधारित कथा तयार करत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती अनेकदा दाखवल्याप्रमाणे भयानक नाही.” असेही त्यांनी नमुद केले. ११ डिसेंबर २०२३ च्या निर्णयानुसार, सर्वोच्च न्यायालयाने एकमताने कलम ३७० कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, सप्टेंबर २०२४ पर्यंत राज्यात निवडणुका घ्याव्यात आणि लवकरात लवकर राज्याचा दर्जा बहाल करावा. आता ही मुदतही संपली आहे आणि निवडणुकाही झाल्या आहेत, त्यामुळे जम्मू-कश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

Karjat News : स्थानिकांवर दुहेरी संकट; एकीकडे बिल्डरकडून फसवणूक तर दुसरीकडे दिवसा ढवळ्या विजेची

मागील वेळी झालेल्या सुनावणीदरम्यान, सरकारच्या प्रतिसादाशिवाय न्यायालय पुढे जाणार नाही. निर्णय घेताना सुरक्षा परिस्थिती आणि जमिनीवरील परिस्थिती विचारात घेतली जाईल, असे न्यायाधिशांनी सांगितले होते. तसेच केवळ संवैधानिक वादविवादांवर आधारित नाही. न्यायालयाने सरकारला उत्तर देण्यासाठी आठ आठवड्यांचा कालावधी दिला होता.

ज्येष्ठ वकील शंकर नारायणन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर २०२३ च्या निकालात न्यायालयाने जम्मू आणि काश्मीरमध्ये सप्टेंबर २०२४ पर्यंत निवडणुका घेण्याचे आणि राज्याचा दर्जा पुनर्संचयित करण्याचे निर्देश दिले होते. पण २१ महिन्यांनंतरही कोणतीही प्रगती झालेली नाही.

राज्यातील परिस्थिती सामान्य- याचिकाकर्ता

या याचिकाकर्ते प्राध्यापक झहूर अहमद भट आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्ते खुर्शीद अहमद मलिक यांनी राज्यातील काही गोष्टींकडे लक्ष वेधले. जम्मू-कश्मीरमधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. यावरून राज्याची सुरक्षा आणि लोकशाही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते. पण राज्याचा दर्जा पुनर्संचयित करण्यात अपयश आल्यामुळे निवडून आलेल्या सरकारचे महत्त्व कमी झाले आहे आणि संघराज्य रचनेची रचना कमकुवत होत असल्याचे याचिका कर्त्यांनी म्हटले होते.

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल

 

 

Web Title: Why should jammu and kashmir not be given statehood supreme court asks centre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • Jammu and Kashmir
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court on Bhojshala : एकाच जागी होणार पूजा अन् नमाज; भोजशाळेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
1

Supreme Court on Bhojshala : एकाच जागी होणार पूजा अन् नमाज; भोजशाळेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.