
CJP Protest News: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि भूविज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत ही बैठक पार पडली. या बैठकीला सीजेपीच्या वतीने प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी प्रतिनिधीत्त्व केले .
सरकारी कार्यालयाऐवजी तटस्थ ठिकाणी चर्चा व्हावी, ही आंदोलनकर्त्यांची मागणी सरकारने मान्य केल्याचे सांगितले जात असून, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया हे ठिकाणी निश्चित करण्यात आले होते. पण बैठकीच्या ऐन अर्धा तास आधी बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया या ठिकाणाऐवजी विठ्ठलभाई पटेल हाऊल या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली.
बैठकींनंतर मिळालेल्या माहितीनुसार बैठकीदरम्यान, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा आग्रह सीजेपीच्या सदस्यांकडून करण्यात आला. पण दोन ते तीन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही बोलले जात आहे. उद्या सरकारसोबत पुन्हा चर्चा होणार आहे. उद्या दुपारपर्यंत धर्मेद्र प्रधान राजीनामा देणार आहेत की नाही. याबाबच चित्र स्पष्ट होईल.
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या प्रतिनिधींसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ही बैठक तब्बल २ तास चालल्याचे त्यांनी सांगितले.
Anti Paper Leak Bill: १० वर्षांचा तुरुंगवास अन् १ कोटीचा दंड!
बैठकीतील चर्चेबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले, “…सीजेपी नेत्यांसोबतची बैठक सुमारे २ तास चालली. त्यांनी आमच्यासमोर ३ प्रमुख मागण्या आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ५ महत्त्वाच्या सूचना मांडल्या आहेत. आम्ही त्यांना आश्वस्त केले आहे की, या विषयांवर सरकारमध्ये चर्चा करून उद्या दुपारी आम्ही पुन्हा एकत्र भेटू आणि पुढील निर्णयाची माहिती देऊ.”
जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि ‘सीजेपी’ नेत्यांमधील ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. उद्या दुपारी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकीत सरकार काय भूमिका घेते आणि आंदोलनावर काय तोडगा निघतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.