
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट अखेर हटवली; वाय. खेमचंद सिंह असणार राज्याचे नवे मुख्यमंत्री
नवी दिल्ली : मणिपूरपासून दिल्लीपर्यंत भाजप सक्रिय झाल्याने सरकार भाजप स्थापनेबाबतच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत. मणिपूरमधील २० हून अधिक भाजप आमदार दिल्लीत पोहोचले आहेत आणि आता पक्षाने विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी एक निरीक्षक नियुक्त केला आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट पुढील वर्षी संपणार आहे आणि पक्षाचे नेते त्यापूर्वी सरकार स्थापन करू इच्छितात.
पक्षाने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांना राज्य निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. मणिपूरमध्ये एनडीए आमदारांची बैठक आता कधीही होण्याची शक्यता आहे आणि नेत्याची निवड होऊ शकते. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये मे २०२३ मध्ये हिंसेला सुरुवात झाली होती. यामध्ये आतापर्यंत सुमारे २६० लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक विस्थापित झाले आहेत.
राज्यातील हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर ६० सदस्यीय विधानसभा निलंबित करण्यात आली होती. १२ फेब्रुवारी २०२६ ही राष्ट्रपती राजवट संपण्याची शेवटची तारीख आहे. भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे १३ वे मुख्यमंत्री असतील.
मंगळवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. आता राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा सादर केला जाईल. खेमचंद सिंह १२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजप सूत्रांनुसार, कुकी जो समुदायाचे समाधान करण्यासाठी १० कुकी आमदारांपैकी एकाला उपमुख्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी नियुक्त केलेले केंद्रीय निरीक्षक तरुण चुग, संबित पात्रा आणि मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह उपस्थित होते.
गेल्या वर्षभरापासून राष्ट्रपती राजवट
१३ फेब्रुवारी २०२५ रोजी मणिपूरमध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. हा कार्यकाळ फक्त ६ महिन्यांसाठी होता आणि ऑगस्ट २०२५ मध्ये पुन्हा ६ महिन्यांसाठी वाढविण्यात आला. एन. बिरेन सिंग यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मणिपुरात भाजपचे 37 आमदार
मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ २०२७ मध्ये संपत आहे. परिणामी, आमदारांना किमान एक वर्षासाठी नवीन सरकार स्थापन करावे आणि काही काम पूर्ण झाल्यानंतरच सार्वजनिक निवडणुका घ्याव्यात अशी इच्छा आहे. सध्या, ६० जागांच्या मणिपूर विधानसभेत भाजपचे ३७ आमदार आहेत.
हेदेखील वाचा : राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी