Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बांग्लादेशमध्ये जे घडत आहे त्यावरून आपल्यासाठी स्वातंत्र्य किती…”; स्वातंत्र्यदिनी सरन्यायाधीश CJI चंद्रचूड यांचे भाष्य

ग्रामीण भाग आणि शहरांतून मोठ्या प्रमाणात नागरिक सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी येत असतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 15, 2024 | 04:31 PM
''बांग्लादेशमध्ये जे घडत आहे त्यावरून आपल्यासाठी स्वातंत्र्य किती...''; स्वातंत्र्यदिनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे भाष्य

''बांग्लादेशमध्ये जे घडत आहे त्यावरून आपल्यासाठी स्वातंत्र्य किती...''; स्वातंत्र्यदिनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे भाष्य

Follow Us
Close
Follow Us:

आज आपला भारत देश ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आज देशभरात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान स्वातंत्र्यदिनानिमित्त सुप्रीम कोर्टात देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्य्रक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी बांग्लादेश हिंसा, स्वातंत्र्य अशा मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

सुप्रीम कोर्टातील स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, ”आज बांग्लादेशमध्ये जे घडत आहे, त्यावरून आपल्यासाठी स्वातंत्र्य किती महत्वाचे आहे हे समजते आहे. २४ वर्षांच्या अनुभवावरून न्यायधीश म्हणून मी सांगू इच्छितो की, न्यायालयांचे काम सामान्य भारतीयांच्या संघर्षाचे प्रतिबिंब अधोरेखित करते. ग्रामीण भाग आणि शहरांतून मोठ्या प्रमाणात नागरिक सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी येत असतात.”

देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर झेंडावंदन केले. तसेच लाल किल्ल्यावरून देशवासियांना मोदींनी संबोधित देखील केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायद्याचा उल्लेख केला होता. देशात एक सेक्युलर सिव्हिल कोड असणे आवश्यक आहे. यामुळे देशात धर्माच्या आधारावर जो भेदभाव केला जात आहे, तो संपुष्टात येईल. सुप्रीम कोर्टाने देखील अनेकदा युसीसीवर चर्चा केली आहे, असे मोदी म्हणाले.

समान नागरी कायद्याचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे सर्वांसाठी सारखे नियम असणे. मात्र आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. जिथे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचे स्वातंत्र्य आहे. तिथे हा कायदा लागू करणे शक्य आहे का? किंवा लागू केल्यास त्याचा काय परिणाम होणार याचा विचार करावा लागणार आहे. जर का देशात समान नागरी कायदा लागू झाला तर देशभरात सर्वांसाठी विवाह,घटस्फोट, वारसा व दत्तक यांच्यासाठी सर्व धार्मिक समुदायांसाठी समान नियम लागू होतील.

Web Title: Cji dhanjay chandrchood said after bangladesh crisis we know for our freedom independence day 2024 supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 04:27 PM

Topics:  

  • Bangladesh
  • cji of india
  • Independence Day

संबंधित बातम्या

Teesta Project : तीस्ता नदीवरून वादावादी! भारताचा विरोध असूनही बांगलादेश सरकार अडकले चीनच्या 1 अब्ज डॉलरच्या सापळ्यात
1

Teesta Project : तीस्ता नदीवरून वादावादी! भारताचा विरोध असूनही बांगलादेश सरकार अडकले चीनच्या 1 अब्ज डॉलरच्या सापळ्यात

Visa Update: मैत्रीचं नवं पर्व! दीड वर्षांच्या तणावानंतर भारत-बांगलादेश Visa सेवा पूर्ववत; युनूसच्या दुर्दैवी भूतकाळाला पूर्णविराम
2

Visa Update: मैत्रीचं नवं पर्व! दीड वर्षांच्या तणावानंतर भारत-बांगलादेश Visa सेवा पूर्ववत; युनूसच्या दुर्दैवी भूतकाळाला पूर्णविराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.