Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suhas Babar: खानापूरमध्ये विरोधकांचे पानिपत; बाबर यांचे वर्चस्व कायम, तब्बल ‘इतक्या’ मतांनी जिंकली जागा

खानापूर विधानसभा मतदारसंघाची ही जागा महाविकास आघाडीने जिंकायची, यासाठी वैभव पाटील यांना ऐनवेळेला निवडणूक रिंगणात उतरवले. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना आदेश दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 26, 2024 | 09:47 PM
Suhas Babar: खानापूरमध्ये विरोधकांचे पानिपत; बाबर यांचे वर्चस्व कायम, तब्बल 'इतक्या' मतांनी जिंकली जागा

Suhas Babar: खानापूरमध्ये विरोधकांचे पानिपत; बाबर यांचे वर्चस्व कायम, तब्बल 'इतक्या' मतांनी जिंकली जागा

Follow Us
Close
Follow Us:

विटा/दीपक पवार:  खानापूर विधानसभा मतदारसंघ २०२४ ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. ते कारण असे की, महायुतीचे सुहास बाबर यांंना मिळालेल्या मताधिक्याने मतदारसंघात नवा विक्रम प्रस्थापित केला. सुहास बाबर यांना तब्बल ७८ हजार १७७ मते मिळाली.  ‘मविआ’चे वैभव पाटील व राजेंद्र देशमुख यांचे पानिपत झाले. बाबर यांनी घेतलेले मताधिक्य पाटील – देशमुख यांना आत्मचिंतन करायला लावणारे ठरले. बाबर हे राजकारणात घेऊ पाहणाऱ्यांचे आयडाॅल ठरले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सुहास बाबर यांना उमेदवारी दिली. आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर मतदारसंघात सुहास बाबर यांना असणारी सहानुभूती, स्व. अनिल बाबर यांनी केलेली टेंभू योजनेचे कामे, सुहास बाबर यांनी अनिल बाबर यांच्या पश्चात विटा शहरात पाणीपुरवठा योजनेसाठी ८७ कोटींचा आणलेला निधी, त्याचबरोबर मतदारसंघातील सर्वांगिण विकासासाठी १३५० कोटींचा आणलेल्या निधीतून मतदारसंघातील विकासाला दिलेली चालना, ही त्यांची जमेची बाजू ठरली. या निवडणूकीत त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे ‘खानापूर’चा किल्ला सर केला.

 निवडणुकीत दिसुन आला लाडक्या बहिणींचा प्रभाव

सुहास बाबर यांच्यामागे आटपाडीचे तानाजी पाटील व विट्यातून मनमंदीरचे अशोक गायकवाड, धर्मेश पाटील, सुशांत देवकर यांच्यासह ज्ञातअज्ञात कार्यकर्त्यांनी ताकद उभा केली. शिवाय मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती  शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी सभा घेऊन बाबर यांना ताकद दिली. शिवाय या मतदारसंघात ९० हजारांच्या आसपास लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेतलेल्या बहिणी आहेत. त्याचा प्रभाव निवडणूकीत प्रामुख्याने दिसून आला. पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हाती घेतली. मात्र मतदारांना ते पसंत पडले नाही, हे मतपेटीतून दिसून आले.

हेही वाचा: …आधी स्वतःचा इतिहास तपासा; सुहास बाबर यांची वैभव पाटलांवर अप्रत्यक्ष टीका

खानापूर व विसापूर भागात देशमुख यांचा जनसंपर्काचा अभाव

वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, डॉ. विश्वजित कदम यांच्या सभा झाल्या, मात्र त्यांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही. याशिवाय पाटील यांचा मतदारसंघात जनसंपर्काचा असलेला अभाव, गमावलेला विश्वास, जुन्या – नव्या कार्यकर्ते, नेत्यांचा नसलेला ताळमेळ पाटील यांच्या पराभवला कारणीभूत ठरला. राजेंद्र देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर केली. देशमुख कुटुंबियांमध्ये एकवाक्यता नसल्याचे सुरवातीला दिसून आले. खानापूर व विसापूर भागामध्ये जनसंपर्काचा त्यांचा अभाव प्रामुख्याने दिसून आला. आटपाडी तालुक्याची अस्मिता हा मुद्दा घेऊन ते निवडणूकीला सामोरे गेले. परंतु मतदारांनी त्यांना धुडकावले. एकंदरीत या निवडणूकीत पुन्हा एकदा खानापूर विधानसभा मतदारसंघात बाबरांची पकड मजबूत झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा: अनिल बाबर खलनायक नव्हे नायक : सुहास बाबर

शंभूराज देसाई यांचा शब्द खरा
खानापूर विधानसभा मतदारसंघाची ही जागा महाविकास आघाडीने जिंकायची, यासाठी वैभव पाटील यांना ऐनवेळेला निवडणूक रिंगणात उतरवले. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना आदेश दिले. परंतु कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाला कात्रजचा घाट दाखवत सुहास बाबर यांच्या पाठीशी राहून मोठ्या मताधिक्यांनी त्यांना निवडून आणले. सुहास बाबर यांचा दाखल करण्यासाठी पाटणचे आमदार शंभूराज देसाई आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देसाई म्हणाले होते, सुहास बाबर हे शंभर टक्के निवडून येणार आहेत. निवडून आल्यानंतर त्यांना घेऊन मी कराडमार्गे मुंबई जाणार आहेत. देसाई यांचा शब्द खरा झाला.

Web Title: Mahayuti shivsena candidate suhas babar defeated mva vaibhav patil and rajendra deshmukh at khanapur assembly 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 09:47 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Suhas Babar

संबंधित बातम्या

Sangli Politics: सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ फसले; अफवांना पूर्णविराम, रोहित पाटील गट ठामपणे महाविकास आघाडीसोबत
1

Sangli Politics: सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ फसले; अफवांना पूर्णविराम, रोहित पाटील गट ठामपणे महाविकास आघाडीसोबत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.