Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी यंत्रणांचा सूडबुद्धीने गैरवापर; जयंत पाटलांची टीका

केंद्रामधील भाजप सरकार शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई करत आहे, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 23, 2022 | 04:20 PM
सरकारी यंत्रणांचा सूडबुद्धीने गैरवापर; जयंत पाटलांची टीका
Follow Us
Follow Us:

बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्रामधील भाजप सरकार शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई करत आहे, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.

बुधवारी पहाटे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ते बार्शीत पत्रकारांशी बोलत होते. वैराग येथील बैठक संपवून करमाळ्याकडे जात असताना बार्शीत माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी थांबले होते.

याबाबत मंत्री पाटील म्हणाले, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या अनेक नेत्यांच्या बऱ्याच गोष्टी उघड केल्या आहेत. त्यामुळे कोणतीही सूचना न देता त्यांच्यावर ही कारवाई केली आहे हे योग्य नाही. केवळ आकसबुद्धीने सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून सकाळी-सकाळी एखाद्या जबाबदार मंत्र्यावर कारवाई केली जाते, ही बाब गंभीर असल्याचेही ते म्हणाले.

या देशात यापूर्वी अशी घटना घडली नाही, असे सांगत सरकारी यंत्रणांनी काही लोकांना प्रवक्तेपद दिले आहे; म्हणूनच कोणाला काहीही माहित नसताना पुढे काय कारवाई होणार याची माहिती ते देतात, अशी टीकाही किरीट सोमय्या यांचे नाव न घेता जयंत पाटील यांनी केली. या प्रकरणात नवाब मलिक खंबीरपणे भूमिका मांडतील असा आशावादही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्य सरकारमधील मंत्र्यांना कितीही अडचणीत आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी १७० आमदारांचा पाठिंबा असल्याने सरकार स्थिर आहे, असेही मंत्री जयंत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Web Title: Misuse of government machinery criticism of jayant patel in barshi solapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2022 | 04:20 PM

Topics:  

  • jayant patil
  • nawab malik
  • नवाब मलिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.