Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोमवारपासून व्यापार, उद्योग सुरू करणारच; कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केलाय निर्धार

जिल्ह्यातील कोरोनाबाधित व मृतांची संख्या वाढत आहे. राज्य शासनाने यापूर्वीच सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी देत ३१ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यानच्या काळात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला.

  • By Vivek Bhor
Updated On: May 22, 2021 | 12:31 PM
सोमवारपासून व्यापार, उद्योग सुरू करणारच; कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केलाय निर्धार
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’ (Break The Chain) अंतर्गत जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन (lockdown) जाहीर केला. याची मुदत रविवारी संपत असून सोमवारपासून (monday) राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व व्यापार, उद्योग सुरू करणार असल्याचा निर्धार चेंबर ऑफ कॉमर्सचे (Kolhapur chember of commerce) अध्यक्ष संजय शेटे (sanjay shete) यांनी शुक्रवारी बोलून दाखविला.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित व मृतांची संख्या वाढत आहे. राज्य शासनाने यापूर्वीच सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी देत ३१ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यानच्या काळात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला.

या काळात दूध, भाजीपाला विक्रीला पोलिसांकडून अटकाव होत आहे. महापालिका प्रशासनाने भाजीपाला घरपोच मिळेल असे सांगितले. पण त्यादृष्टीने फारसे नियोजन केले नाही. दूध घरपोच देणारी यंत्रणा अपुरी असल्याने नागरिकांना दूध आणायला बाहेर पडावेच लागते. पण अशा नागरिकांवरही पोलिस कारवाई करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे.

[read_also content=”एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला; प्रवाशांच्या पासपोर्टसह क्रेडिट कार्डचा डेटा लीक; आकडेवारी ऐकाल तर थक्क व्हाल https://www.navarashtra.com/latest-news/air-india-servers-hacked-massive-cyberattack-data-leaks-most-important-info-of-air-india-passengers-stolen-nrvb-132370.html”]

किती नुकसान सहन करायचे?

कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार उद्योग अगोदरच अडचणीत आहे. पण कोरोनाची चेन तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला २३ मे पर्यंत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. रविवारी ही मुदत संपत आहे. वर्षभरापासून आम्ही नुकसान सहन करत आहोत. आता अजून नुकसान सहन करण्याची व्यापार्‍यांची मानसिकता नाही. राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करून सोमवारपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत जिल्ह्यातील सर्व व्यापार व उद्योग सुरू करणार असल्याचे संजय शेटे यांनी स्पष्ट केले.

trade-industry-will-start-from-Monday-Decision-of-Kolhapur-Chamber-of-Commerce nrvb

Web Title: Trade industry will start from monday decision of kolhapur chamber of commerce nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2021 | 12:31 PM

Topics:  

  • Commerce
  • kolhapur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.