Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या प्रदुषणामुळे दम्याच्या रूग्णात ४० टक्क्यांनी वाढ, दीर्घकाळ खोकला ठरू शकते दम्याचं लक्षण

दमा झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. श्वास घेताना त्रास होणे, फुफ्फुसांमध्ये होणाऱ्या वेदना इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दमा झाल्यानंतर आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 08, 2025 | 10:14 AM
वाढत्या प्रदुषणामुळे दम्याच्या रूग्णात ४० टक्क्यांनी वाढ

वाढत्या प्रदुषणामुळे दम्याच्या रूग्णात ४० टक्क्यांनी वाढ

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. राज्यात वाढलेल्या प्रदूषणामुळे दम्याच्या आजारांसह इतर आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. दमा झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे दम्याची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करावे. दमा झाल्यानंतर फुफ्फुसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय श्वास घेताना अनेक अडथळे निर्माण होतात.(फोटो सौजन्य – iStock)

रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, कधीच उद्भवणार नाही मधुमेहाची समस्या

दम्याच्या आजारामध्ये श्वसननलिकेला सूज येते. यामुळे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होतात आणि जास्त खोकला येतो. अस्थमाचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. बदलत्या ऋतूनुसार सर्दी-खोकला यांसारख्या आजारांची समस्या उद्भवते. अशावेळी औषधे घेतल्यानंतर सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळते. पण जर औषधं घेऊनही या समस्येपासून सुटका होत नसेल आणि दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करु नका. दीर्घकाळ खोकला हे अस्थमा म्हणजे दम्याचं लक्षण असू शकते.

दम्याच्या रुग्णांना खोकल्याची समस्या नेहमीच असू शकते आणि ही समस्या विशेषतः रात्रीच्या वेळी, हसताना आणि कधीकधी व्यायाम करताना वाढते. दम्यामध्ये रुग्णाला छातीत घट्टपणा जाणवतो. दम्यामध्ये छाती जड झाल्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा शारीरिक काम करताना ही समस्या वाढू शकते. उपचारांविना दम्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर त्याचा त्रास आणखी वाढू शकतो. अशा व्यक्तींना सतत दमल्यासारखं वाटतं, घरी, शाळेत नीट अभ्यास करता येत नाही, शाळा किंवा कामाच्या ठिकाणी योग्य काम करता येत नाही. काही लोकांमध्ये फुप्फुसापर्यंत संसर्ग होण्याचा धोका असतो.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सम्राट शहा म्हणाले की, गेल्या काही वर्षात पुण्यात बांधकाम आणि रस्ते बांधणी मोठ्याप्रमाणात सुरू असल्याने हवेतील गुणवत्तेवर विपरित परिणाम झाला आहे. वातावरणातील या धुळीमुळे अलर्जी होऊन अनेक जण दम्यांचे शिकार होत आहेत. मागील काही वर्षात दम्याच्या रूग्णात 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाढत्या प्रदुषणामुळे काही जणांना वारंवार सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने ते उपचारासाठी रूग्णालयात येत आहेत. दर महिन्याला रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात खोकल्याची तक्रार घेऊन येणाऱ्या 10 पैकी 4-5 जणांना दम्याचा विकार असतो. परंतु, अनेकदा यासंदर्भात पुरेशी माहिती नसल्याने याकडे दुर्लक्ष केलं जातं. काहींच्या घरात एखाद्याला आधी अस्थमा असल्यास कुटुंबातील इतर व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. परंतु, वेळीच निदान व उपचार घेतल्यास दमा नियंत्रणात राहू शकतो. मात्र, अनेकांना या आजाराच्या लक्षणांची माहिती असते. पण छातीत जडपणा येणे हे दम्याचे लक्षण आहे. बऱ्याचदा तर अशाप्रकारचे एकही लक्षण आढळून येत नाही. केवळ खोकलाच होतो अशावेळी या खोकल्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, हा खोकला दम्यामुळेच असू शकतो. म्हणून दिर्घकालीन खोकला, घशातून खरखर आवाज येणे, छाती भरून येणे ही दम्याची लक्षणं असू शकतात. या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

डॉ. सम्राट पुढे म्हणाले की, वारंवार सर्दी होणे, शिंका येणे, घशातून खरखर आवाज येणे, वातावरण बदलल्यावर सर्दी-खोकल्याचा प्रादुर्भाव होणे अशी लक्षणे आढळून आली तर तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. डॉक्टर वैद्यकीय परीक्षण करून दम्याचे निदान करतात. ‘पीक-फ्लो’ मीटरसारख्या यंत्राद्वारे रुग्णाची हवा फुंकण्याची क्षमता तपासून फुफ्फ्साची क्षमता तपासण्यात येते. त्यामुळे दमा आहे की नाही याचे प्राथमिक निदान शक्य होते. दमा आहे की नाही याचे निदान करण्यासाठी लंग्ज फंक्शन टेस्ट (फुफ्फुसाच्या कार्याची चाचणी) करावी लागते. त्यास ‘स्पायरोमीटरी’ असे म्हणतात. याशिवाय रक्ताची तपासणी, एक्स-रे काढणे, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे, अन्य आजारांमुळे तर दम लागत नाही याची चाचणी करण्यासाठी अन्य तपासण्या कराव्या लागतात.

आयुष्यात दिसून येतील सकारात्मक बदल! दिवसाची सुरुवात करा ‘या’ आयुर्वेदिक नियमांप्रमाणे, शंभर वर्षांपेक्षा जास्त जगाल आयुष्य

बहुतेक लोकांना सर्दी किंवा ब्राँकायटिसमध्ये कफ किंवा कोरडा खोकला येतो. परंतु, ते देखील दम्याचे लक्षण देखील असू शकते. ज्या गोष्टींमुळे दमा वाढू शकतो, त्या गोष्टींपासून दमारुग्णांनी दूर राहणे अत्यावश्यक आहे. दमाग्रस्त व्यक्तींनी कुठल्याही प्रकारच्या धुळीपासून, धुरापासून अगदी उदबत्तीच्या धुरापासूनही दूर राहणे गरजेचे आहे. याशिवाय त्यांनी तंबाखूचे सेवन व धूम्रपान प्रकर्षाने टाळले पाहिजे, असेही डॉ. सम्राट म्हणाले.

Web Title: 40 percent increase in asthma patients due to increasing pollution health care tips lungs health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Care Tips
  • Lung health

संबंधित बातम्या

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक
1

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका
2

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते
3

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते

तुम्हाला सुद्धा कच्चा तांदूळ खाण्याची सवय आहे का? मग शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, आतड्यांचे होईल नुकसान
4

तुम्हाला सुद्धा कच्चा तांदूळ खाण्याची सवय आहे का? मग शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, आतड्यांचे होईल नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.