
फोटो सौजन्य - Social Media
प्रत्येकामध्ये गुण-अवगुण असतात. काही चांगले असतात तर काही वाईट असतात. चांगले गुण शत्रूचे जरी असले तरी त्याचा अवलंब करणे हे आपल्याच फायद्याचे असते. कधी कधी तर चांगल्या व्यक्तींमध्येही अनेक वाईट दोष असतात. रामायणातील रावण जरी त्याकाळातील विलन असला तरी त्याच्यामध्येही असे अनेक गुण होते, जे आताच्या काळातील तरुणांनी आत्मसात केले पाहिजे. फक्त तरुणच नव्हे तर प्रत्येकाने या गुणांना अंगीकृत केले पाहिजे.
हे देखील वाचा : हृदयाच्या आरोग्यासाठी फार धोक्याचे असतात ‘हे’ आजार; जाणून घ्या.
रावण हा बलाढ्य होता, लढवय्या होता तितकाच आपल्या परिचयांसाठी प्रेमळ होता. तो एक विद्वान होता, आपल्या प्रजेसाठी उत्तम शासक होता तसेच प्रामाणिक भक्त होता. रावणामध्ये भले अनेक दुर्गुण असतील पण त्यामध्ये चांगले गुणही होते हे विसरता कामा नये. रावण नेहमी म्हणत असे कि, ‘ शुभस्य कर्म शीघ्रम’. याचा अर्थ असा आहे कि,” शुभ कार्याला कधीही विलंब केला नाही पाहिजे. मरताना श्री रामाच्या सांगण्यावरून रावणाने लक्ष्मणाला हि शिकवण दिली होती.
आयुष्य फार लहान आहे. कधी काय घडेल याचं कुणालाच माहिती नाही म्हणून सत्कर्म करताना उशीर करू नये. रावण एक बलाढ्य योद्धा होता. त्याच्या शब्दकोशात भीती नावाचा शब्दच नव्हता. रावणाला भयमुक्त आयुष्य जगायला आवडायचे. आपणही भीती बाजूला ठेऊन आपल्या ध्येयाच्या मागे हात धुवून लागले पाहिजे.
हे देखील वाचा : झाडूला सॉक्सने झाकून हे घरगुती काम करा अधिक सोपे
रावणाने मरताना लक्ष्मणाला मरत असताना एक सुंदर शिकवण दिली होती. रावण म्हणाला होता कि, कधी कोणत्याही व्यक्तीला कमी लेखू नका आणि कमी तर समजूच नका. प्रत्यकाला बरोबरीच्या नजरेने पहा. इथे आपल्यापेक्षा कुणी मोठा नाही आहे तसेच कुणी लहानही नाही आहे. रावणाकडे ग्रहावर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य होते. तो त्याच्या सोयीनुसार ग्रहांची दिशा ठरवत असे. याचा अर्थ कि आपले भाग्य आपल्या हातात आहे. आपण आपल्या कर्मांनी आपले भाग्य बदलू शकतो आणि आपल्या सोयीनुसार आपले आयुष्य घडवू शकतो.