Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Physical Relationship: जोडप्यांमध्ये शारीरिक संबंधादरम्यान दुरावा का येतो? 5 सवयींमुळे संपतं नातं मॅरेज कोचने सांगितले कारण

लग्नाच्या काही वर्षांनंतर जोडप्यांमध्ये दुरावा येऊ लागतो आणि हा केवळ मानसिकच नाही तर अगदी शारीरिक संबंधांमधील दुरावादेखील असतो आणि याचे नेमके कारण काय आहे याबाबत अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 02, 2025 | 11:37 PM
लग्नानंतर शारीरिक आकर्षण टिकवणे किती महत्त्वाचे (फोटो सौजन्य - iStock)

लग्नानंतर शारीरिक आकर्षण टिकवणे किती महत्त्वाचे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

‘शादी का लड्डू जो खाए वो पछताएँ, जो ना खाए वो भी पछताएँ…’ लग्नाबद्दलची ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. खरंतर, लग्नाच्या काही वर्षांनी हा लाडू फिका पडू लागतो. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही संपूर्ण जगाशी लढता त्याला आपले बनवण्यासाठी, लग्नाच्या काही वर्षांनी, तुमचा प्रत्येक शब्द त्या व्यक्तीशी भांडण्याचे कारण बनतो. इतकंच नाही तर तुमच्यात मानसिक दुरावा येण्यासह शारीरिक दुरावाही येऊ लागतो.

आपण हाच विचार करतो की हे असं का होतंय, हा तोच माणूस आहे की, ज्याच्यासाठी आपण जीव तोडत आहोत, हा माणूस किंवा ही व्यक्ती इतकी का बदलली वा बदलला. चला जाणून घेऊया मॅरेज कोच आणि सायकॉलॉजिकल कौन्सिलर डॉ. सपना शर्मा यांच्याकडून, तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील आकर्षण कमी करणाऱ्या नातेसंबंधातील  त्या ५  चुका तुम्हाला माहीत असायलाच हव्यात (फोटो सौजन्य – iStock) 

लग्नानंतरचा रोमान्स 

रोमान्स जपून ठेवणे गरजेचे आहे

हळूहळू वैवाहिक जीवनात प्रेम आणि उत्साह दोन्ही कमी होऊ लागतात. याची अनेक कारणे असू शकतात. पण नात्यात काही चुका असतात ज्यामुळे लग्नानंतर प्रेम कमी होते. बऱ्याचदा समाजामुळे हे लग्न वर्षानुवर्षे टिकते, परंतु जोडप्यांमधील शारीरिक जवळीक आणि आकर्षण संपते. पण हे नक्की का होते याची कारणे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवल्यावर होतात शरीरात 8 बदल, लग्नापूर्वी हे माहीत असायलाच हवे

प्रायव्हसी न मिळणे

बरेचदा एकांत जपला जात नाही

भारतातील अनेक कुटुंबे एकत्र राहतात.घरातील वडीलधाऱ्यांचा असा विश्वास असतो की जोडप्यांना जास्त एकांत देणे चांगले नाही. तसंच एकमेकांसमोर एकमेकांना स्पर्श करणे किंवा दिवसा खोलीचा दरवाजा बंद करणे हे असभ्य मानले जाते. रात्री सर्वजण झोपलेले असतानाच खोलीचा दरवाजा बंद केला जाऊ शकतो. यामुळे पती-पत्नींना प्रायव्हसी राखणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत, जोडपे एकत्र राहतात पण जवळ येऊ शकत नाहीत.

रोमँटिक डेटवर जाणे बंद करणे 

पती – पत्नी एकमेकांना वेळ देत नाहीत

मोठ्या शहरांमध्ये किंवा विभक्त कुटुंबांमध्ये राहणारे लोक अजूनही ही एक संकल्पना समजतात. पण संयुक्त कुटुंबात पती-पत्नी एकत्र बाहेर जाणे खूप कठीण असते. लग्नानंतर बाहेर जाण्याची पद्धत अशी असते की संपूर्ण कुटुंब, मित्र किंवा मुले एकत्र असतात आणि ते फक्त गर्दीच्या ठिकाणीच बाहेर जातात. वेगळे रोमँटिक डेटिंग करण्याचा विचारही मनात येत नाही. सुट्टीच्या वेळी किंवा प्रवासातही, बहुतेक मित्र किंवा कुटुंब एकत्र राहतात.

घरी जुनाट कपडे घालणे

स्वतःकडे लक्ष दिले जात नाही

तुम्हाला तुमच्या डेटिंगचे दिवस आठवतात का? तुम्ही तुमच्या प्रियकराला भेटायला सर्वात सुंदर पोशाखात जाता. सुंदर कपडे, केशरचना, दागिने आणि परफ्यूम, सर्वकाही प्रभावित करण्यासाठी वापरले जाते. पण लग्नानंतर, हे सर्व फक्त इतरांना दाखवण्यासाठी केले जाते. तर पती-पत्नीसमोर तेच जुने आणि फाटलेले कपडे घालतात, जे फेकून देण्याच्या तयारीत असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आकर्षणाची अपेक्षा कशी करू शकता?

शारीरिक संबंधांपूर्वी ‘हे’ पदार्थ खाणे ठरेल त्रासदायक, रात्र काढणेही होईल कठीण

फिटनेसकडेही दुर्लक्ष

स्वतःला फिट ठेवायला हवे

तुम्ही हे नक्कीच पाहिले असेल की जेव्हा कोणाचे लग्न होते, मग ते मुलगा असो वा मुलगी, आपण या खास दिवशी अगदी फिट राहण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आधीपासून तयारी केली जाते. पण लग्नानंतर, आपण पुन्हा बसून काम करतो, जास्त खातो-पितो आणि झोपत राहतो. वयाच्या ३० व्या वर्षानंतर, अनेक लोकांचे वजन वाढते किंवा त्यांच्या शरीराची रचना बिघडते. याशिवाय मूल झाल्यानंतरही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे फिटनेसकडे दुर्लक्ष करून स्वतःची हेळसांड केली जाते 

इथे वजन किंवा आकाराबद्दल नाही तर शरीराला तंदुरुस्त आणि उत्साही ठेवण्याबद्दल आहे. लोक विसरतात की शारीरिक आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी काही विशेष गुण आवश्यक असतात. जर लग्नापूर्वी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी हे गुण आवश्यक होते, तर लग्नानंतर तुमचे लठ्ठ शरीर अचानक आकर्षक दिसू शकते का? हा विचार नक्कीच व्हायला हवा 

कुतूहल कायम जागृत ठेवणे

नातं, रोमान्स आणि शारीरिक आकर्षणातील कुतूहल कायम ठेवावे

शारीरिक जवळीक आणि शारीरिक आकर्षणासाठी थोडेसे कुतूहल नेहमी जागृत ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या वैवाहिक जीवनासाठी नवीनता नेहमीच महत्त्वाची असते, मग ती शरीराच्या आत असो वा बाहेर. तुम्हाला कायम तुमच्या जोडीदाराला खुष करता यायला हवे आणि त्यासाठी शारीरिक आकर्षण कसे ठेवता येईल हेदेखील महत्त्वाचे आहे 

Web Title: 5 reasons why indian couples lose interest in their physical relation or intimacy for each other relationship tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 11:34 PM

Topics:  

  • Physical Intercourse
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र
1

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध
2

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’
3

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’

‘100 पैकी 4 मुली अपवित्र…’ प्रेमानंद महाराज खरंच असं म्हणाले का? काय आहे Viral Video चे तथ्य
4

‘100 पैकी 4 मुली अपवित्र…’ प्रेमानंद महाराज खरंच असं म्हणाले का? काय आहे Viral Video चे तथ्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.