Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधीच उद्भवणार नाही मधुमेहाची समस्या, ‘या’ पद्धतीने करा वेलचीच्या पाण्याचे सेवन, रक्तातील साखरेचे प्रमाण राहील नियंत्रणात

शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. अशावेळी वेलचीचे पाणी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. जाणून घेऊया वेलचीच्या पाण्याचे फायदे आणि पाणी बनवण्याची पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 21, 2024 | 08:48 AM
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी वेलची

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी वेलची

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शिवाय मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. मधुमेह झाल्यानंतर अनेक पथ्य पाळावी लागतात. पथ्य न पाळल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण आणखीन जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात जास्त गोड किंवा साखरयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. मधुमेह झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचारासोबतच घरगुती उपाय सुद्धा करावे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर किंवा मधुमेह होऊ नये, म्हणून वेलचीच्या पाण्याचे सेवन कसे करावे? वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी वेलची:

वेलचीच्या पाण्याचे नियमित किंवा आठवड्यातून तीनदा सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. शिवाय शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढून रु रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेह झाल्यानंतर नियमित वेलचीचा चहा किंवा वेलचीचे पाणी प्यावे. वेलचीमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

वेलचीचा चहा:

अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. अशावेळी मसाले चहा बनवण्याऐवजी वेलची घालून चहा बनवावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. वेलचीचा चहा प्याल्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होते, पचन क्रिया सुधारते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळीस वेलचीच्या चहाचे सेवन करू शकता.

वेलचीचे पाणी:

मधुमेह झाल्यानंतर वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. वेलचीचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात २ वेलची बारीक कुस्करून टाका. दोन तास ठेवल्यानंतर वेलचीच्या पाण्याचे सेवन करा. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. वेलचीचे पाणी प्याल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील इतर अवयवांचे कार्य सुधारते.

लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

हृदयाचे आरोग्य सुधारते:

हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. शिवाय या पाण्याच्या सेवनामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तवाहिन्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. वेलचीतील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of drinking cardamom water for the body home remedies after diabetes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 08:48 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
1

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण
2

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या ‘या’ फळाचा रस, राहाल कायमच ताजेतवाने
3

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या ‘या’ फळाचा रस, राहाल कायमच ताजेतवाने

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश
4

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.