Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीतील वेदना, क्राम्पसपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ लाल भाजीचे सेवन, शरीराला होतील फायदे

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिला शारीरिक समस्यांना तोंड देतात. पाळीच्या वेदना वाढल्यानंतर शरीरात काहीवेळा थकवा जाणवतो. अशावेळी आहारात बीटचे सेवन करावे. बीट खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 30, 2025 | 01:45 PM
मासिक पाळीतील वेदना, क्राम्पसपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' लाल भाजीचे सेवन

मासिक पाळीतील वेदना, क्राम्पसपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' लाल भाजीचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक स्त्रीला महिन्यात पाच दिवस अतिशय नकोसे वाटत. कारण मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी आल्यानंतर कंबर दुखणे, पोटात वेदना होणे, ओटीपोटात वेदना होणे, मळमळ किंवा उलट्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्वच समस्यांना सामना महिलांना प्रत्येक महिन्यात करावा लागतो. मासिक पाळी आल्यानंतर शरीराची जास्त काळजी घ्यावी. कारण रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात थकवा किंवा अशक्तपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरातील ऊर्जा कमी झाल्यानंतर वारंवार चक्कर येणे किंवा काम करण्याची इच्छा होत नाही. अशावेळी आहारात बीटचे सेवन करावे. महिलांच्या आरोग्यासाठी बीट खाणे वरदान मानले जाते.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमध्ये कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ

शरीरात वाढलेला थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचे आणि सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा थकवा, अशक्तपणा कमी होत नाही. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले लोह शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढतात. हार्मोन्सचे संतुलन राखणे, स्नायूंना आराम देणे, त्वचेवरील तेज कायम टिकवून ठेवण्यासाठी बीट खावे. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये बीट खाल्यामुळे महिलांच्या शरीराला नेमके कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

क्रॅम्प्स आणि सूज कमी होते:

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना अतिशय असहाय वाटू लागतात. यामुळे पोटाच्या स्नायूंना सूज येण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी आहारात बीट खावे. बीटचा रस, भाजी किंवा सॅलड बनवून तुम्ही खाऊ शकता. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतात. शरीरात जमा झालेले अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकण्याचे काम बीट करते. त्यामुळे मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्याही गोळ्यांचे सेवन न करता घरगुती उपाय करून आराम मिळवावा.

रक्तवाढ आणि थकवा कमी होतो:

शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर अशक्तपणा वाढू लागतो. अशावेळी आहारात कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी बीटचा रस नियमित प्यावा. बीटचा रस प्यायल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारते. बीटमध्ये लोह आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. या दोन्ही घटकांमुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढते.

शरीर स्वच्छ होते:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित बीटच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल. आतड्यांमध्ये चिटकून राहिलेला विषारी मला स्वच्छ करण्यासाठी बीट आणि पुदिन्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीर स्वच्छ होते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी बीट खावे.

Sperm Count: पुरुषांसाठी धोकादायक ठरतेय अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड, धाडकन कमी होतात शुक्राणू; अभ्यासात धक्कादायक खुलासा

FAQs (संबंधित प्रश्न)

मासिक पाळी म्हणजे काय?

मासिक पाळी म्हणजे गर्भाशयाच्या अस्तरातून होणारा रक्तस्त्राव, जो मासिक पाळीच्या चक्राचा भाग असतो. गर्भधारणेसाठी शरीर गर्भाशयाचे अस्तर तयार करते. गर्भधारणा न झाल्यास, हे अस्तर रक्ताच्या रूपात योनीमार्गातून बाहेर टाकले जाते.

मासिक पाळी कधी उशिरा येते?

गर्भधारणा हे मासिक पाळी उशिरा येण्याचे एक प्रमुख कारण आहे. ताणतणाव, वजन बदलणे, किंवा काही वैद्यकीय स्थिती यामुळे देखील मासिक पाळी उशिरा येऊ शकते. जर पाळी अपेक्षित वेळेपासून एक आठवड्यापेक्षा जास्त काळ आली नाही, तर गर्भधारणा चाचणी करणे उचित आहे.

डॉक्टरांना कधी भेटावे?

जर ३ ते ६ महिने मासिक पाळी येत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अतिशय अनियमित, खूप कमी किंवा जास्त रक्तस्त्राव होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume this red vegetable in your diet to get permanent relief from menstrual cramps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • period
  • women health

संबंधित बातम्या

मासिक पाळी कायमच उशिरा येते? शरीरात होणारे ‘हे’ बदल असू शकतात आरोग्यासाठी धोक्याची घंटा, वेळीच व्हा सावध
1

मासिक पाळी कायमच उशिरा येते? शरीरात होणारे ‘हे’ बदल असू शकतात आरोग्यासाठी धोक्याची घंटा, वेळीच व्हा सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.