Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोड आलेल्या ‘या’ भाज्यांचे सेवन केल्यास शरीरात तयार होतील विषारी तत्व, वाढेल उलटी आणि डायरियाचा धोका

मोड आलेल्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये विष तयार होण्याची शक्यता असते. या भाज्या संपूर्ण शरीराला हानी पोहचवतात. याशिवाय उलट्या, मळमळ, डायरिया होऊ शकतो. जाणून घ्या मोड आलेल्या कोणत्या भाज्या खाऊ नयेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 31, 2025 | 02:09 PM
मोड आलेल्या 'या' भाज्यांचे सेवन केल्यास शरीरात तयार होतील विषारी तत्व

मोड आलेल्या 'या' भाज्यांचे सेवन केल्यास शरीरात तयार होतील विषारी तत्व

Follow Us
Close
Follow Us:

दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी पोषण आहार घेणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात फळे, भाज्या, सुका मेवा आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील सर्वच अवयव निरोगी राहतात. निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, भरपूर पाणी आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. पण बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यात उगवलेल्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आणलेल्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या जातात. भाज्यांमधील कीड, मोठं मोठ्या अळी शरीरात गेल्यानंतर मेंदूमध्ये जातात. त्यामुळे घरी आणलेल्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.(फोटो सौजन्य – istock)

Gallstones Symptoms: पित्ताच्या पिशवीत तयार होत आहे दगड, शौचात दिसेल भयंकर लक्षण; दुर्लक्ष केल्यास थेट ऑपरेशन

पोषक आहारात पालेभाज्या, कडधान्य, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. पण बऱ्याचदा हेच पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात. बाजारातून विकत आणलेल्या भाज्या जास्त वेळ तशाच पडून राहिल्यानंतर त्यांना हळूहळू मोड येतो. मोड आलेल्या भाज्या बनवलेल्या जातात. पण आहारात मोड आलेल्या भाज्यांचे अजिबात सेवन करू नये. मोड आलेल्या भाज्यांमध्ये विषारी घटक तयार होतात, के घटक पोटात गेल्यानंतर आतड्यांमध्ये किंवा पोटात विष तयार होण्याची जास्त शक्यता असते. अशा भाज्यांच्या सेवनामुळे उलट्या, मळमळ होऊ शकते. चला तर जाणून घेऊया मोड आलेल्या कोणत्या भाज्या खाऊ नयेत.

मोड आलेल्या ‘या’ भाज्यांचे अजिबात करू नका आहारात सेवन:

कांदा:

जेवणात वापरला जाणारा अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणजे कांदा. कांद्याशिवाय जेवणाला व्यवस्थित चव लागत नाही. कांद्याच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते. पण बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात कांदे आणून ठेवले जातात. हे कांदे मोठ्या भांड्यात किंवा गोणी भरून ठेवले जातात. त्यामुळे कांद्यांना मोड येण्याची जास्त शक्यता असते. मोड आलेले कांदे कापून खाल्ले जातात. मोड आलेल्या कांड्यांमध्ये अल्कलॉइड खासकरून एन-प्रोपाइल डायसल्फाइडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरातील लाल रक्तपेशींना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. तसेच यामुळे हेमोलिटिक अ‍ॅनीमिया होऊ शकतो.

लाखो वर्षांपासून भारतीय लोक हाताने का जेवतात? जाणून घ्या शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे

लसूण:

डाळ किंवा भाजीला फोडणी देताना लसूणचा वापर केला जातो. लसूणच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते. पण मोड आलेला लसूण अजिबात खाऊ नये. यामुळे पचनक्रियेसंबंधित समस्या उद्भवून उलट्या, मळमळ किंवा लाल रक्तपेशींना हानी पोहचते. शरीरासाठी लाल रक्तपेशी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे मोड आलेली लसूण खाऊ नये.

FAQs (संबंधित प्रश्न)

मोड आलेल्या भाज्या का खाऊ नये?

मोड येण्याची प्रक्रिया उघड्यावर किंवा अस्वच्छ स्थितीत झाल्यास, बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. बटाट्याला मोड आल्यावर सोलानिन आणि चाकोनिन नावाचे विषारी घटक तयार होतात, जे विषारी असू शकतात आणि ते खाल्ल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

मोड आलेल्या भाज्या खाताना काय काळजी घ्यावी?

मोड येण्याची प्रक्रिया स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी करावी. मोड आलेली कडधान्ये चांगली शिजवून खावी, ज्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consuming these rotten vegetables will produce toxic elements in the body sprouted vegetable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • Green leafy vegetables
  • Health Care Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय
1

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यासंबंधित १०० टक्के वाढतात ‘हे’ गंभीर आजार, लठ्ठपणा- मधुमेहामुळे होईल शरीराचे नुकसान
2

जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यासंबंधित १०० टक्के वाढतात ‘हे’ गंभीर आजार, लठ्ठपणा- मधुमेहामुळे होईल शरीराचे नुकसान

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा
3

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर
4

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.