Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजाच्या अनोख्या कल्पनेने बदलली शहराची ओळख; तुम्हाला माहिती आहे का? जयपूरला कसा मिळाला पिंक सिटीचा दर्जा

History Of Pink City : राजस्थानची राजधानी जयपूर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. पण याचे नाव पिंक सिटी का आणि कसे पडले ते तुम्हाला माहिती आहे का? यामागे एक रंजक कथा दडलेली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 03, 2025 | 08:29 AM
राजाच्या अनोख्या कल्पनेने बदलली शहराची ओळख; तुम्हाला माहिती आहे का? जयपूरला कसा मिळाला पिंक सिटीचा दर्जा

राजाच्या अनोख्या कल्पनेने बदलली शहराची ओळख; तुम्हाला माहिती आहे का? जयपूरला कसा मिळाला पिंक सिटीचा दर्जा

Follow Us
Close
Follow Us:

भारतामध्ये फिरण्यासाठी सुंदर व ऐतिहासिक ठिकाणांची काहीच कमी नाही. प्रत्येक शहराची स्वतःची एक खास ओळख असते, जी त्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते. काही शहरं ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या सांस्कृतिक परंपरेसाठी. असाच एक खास शहर म्हणजे जयपूर, ज्याला आपण प्रेमानं ‘गुलाबी शहर’ किंवा ‘पिंक सिटी’ म्हणतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जयपूरला हे नाव का मिळालं?

भारतीयांना का आहे या 7 देशात जाण्यास मनाई; परदेशी पर्यटनासाठी Travel Advisory वाचूनच योग्य तो निर्णय घ्या

जयपूरचं नाव घेताच डोळ्यांसमोर सुंदर राजवाडे, रंगीबेरंगी बाजारपेठा आणि भव्य हवेल्या येतात. पण या शहराची अशी कोणती गोष्ट आहे, जी त्याला “गुलाबी” बनवते? हे फक्त इमारतींचा रंग आहे का, की यामागे एखादी रंजक कहाणी दडलेली आहे? जर तुम्हालाही जयपूरची ही खास ओळख कशी निर्माण झाली हे जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला याचा इतिहास समजून घ्यावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया, जयपूरला पिंक सिटी का म्हणतात यामागची कहाणी.

जयपूरची स्थापना कधी झाली?

राजस्थानची राजधानी असलेलं जयपूर शहर १८ नोव्हेंबर १७२७ रोजी कछवाहा वंशातील महाराजा सवाई जयसिंह दुसरे यांनी वसवलं होतं. त्यांनी बंगालमधील सुप्रसिद्ध वास्तुविशारद विद्याधर भट्टाचार्य यांची मदत घेऊन संपूर्ण शहराची रूपरेषा आखली. आणि हो – “जयपूर” हे नाव देखील जयसिंह यांच्या ‘जय’ या शब्दावरून ठेवण्यात आलं.

जयपूर आधी पिवळा आणि पांढऱ्या रंगाचा होता

आज जरी जयपूर गुलाबी रंगासाठी ओळखला जात असला, तरी सुरुवातीला या शहरातील अनेक इमारती पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या होत्या. पण या शहराचा ‘पिंक सिटी’ बनण्यामागे एक खास ऐतिहासिक कारण आहे.

इंग्लंडच्या राजघराण्याच्या स्वागतासाठी बदलला शहराचा रंग

१९व्या शतकात, जेव्हा क्वीन एलिझाबेथ आणि प्रिन्स ऑफ वेल्स – युवराज अल्बर्ट भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांचा जयपूर भेटीचा कार्यक्रम ठरलेला होता. महाराजा सवाई जयसिंह यांना त्यांच्या स्वागतात कसलीही कमी ठेवायची नव्हती. त्यांनी ठरवलं की संपूर्ण शहरच गुलाबी रंगात रंगवलं जावं, जेणेकरून पाहुण्यांना एक भव्य आणि आकर्षक स्वागत वाटेल.

गुलाबी रंगाचं कायमचं अस्तित्व

जयपूरमध्ये आल्यावर युवराज आणि राणीने शहरातील सजावट पाहून भारावून गेले. त्यांनी महाराजांचे मनापासून आभार मानले. त्यानंतर महाराजांनी ठरवलं की जयपूरचं वैशिष्ट्य म्हणून यापुढे संपूर्ण शहर गुलाबीच राहील.

मेहमाननवाजीचं प्रतीक आहे गुलाबी रंग

मग तुम्हालाही प्रश्न पडेल, की गुलाबी रंगच का निवडला गेला? तर त्यामागचं कारण म्हणजे – गुलाबी रंगाला आतिथ्य आणि स्नेहभाव दर्शवणारा रंग मानला जातो. पाहुण्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या रंगाचा वापर केला जातो. आजही जयपूरच्या रस्त्यांवर, हवेल्यांवर आणि राजवाड्यांवर तो गुलाबी रंग आपल्याला दिसतो आणि यामुळेच आज जयपूर ‘पिंक सिटी’ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या

FAQs (संबंधित प्रश्न)

पिंक सिटीची खासियत काय?
बाजार, किल्ले, मंदिरे, राजवाडे आणि वन्यजीव अभयारण्ये.

जयपूरमध्ये खाण्यासाठी काय प्रसिद्ध आहे?
दाल बाटी चुरमा, लाल मांस, कचोरी आणि घेवर.

Web Title: Do you know the history of a jaipur why is it called as pink city travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • History
  • Jaipur
  • travel news

संबंधित बातम्या

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे
1

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल
2

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल   भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले
3

‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?
4

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.