Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील एकमेव मंदिर जिथे विराजमान आहेत विना सोंडेचे गणपती; पत्राद्वारे पूर्ण होते भक्तांची इच्छा

Garh Ganesh Temple : गणपतीच्या मूर्तीचे ठरलेले रूप आपण प्रत्येक मंदिरात पाहतो ज्यात गणपती सोंडसह विराजमान असतात पण आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराची माहिती सांगत आहोत जिथे श्रीगणेश सोंडेशिवाय विराजमान झालेले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 24, 2025 | 08:32 AM
भारतातील एकमेव मंदिर जिथे विराजमान आहेत विना सोंडेचे गणपती; पत्राद्वारे पूर्ण होते भक्तांची इच्छा

भारतातील एकमेव मंदिर जिथे विराजमान आहेत विना सोंडेचे गणपती; पत्राद्वारे पूर्ण होते भक्तांची इच्छा

Follow Us
Close
Follow Us:

भारतामध्ये गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. दहा दिवस घराघरांत व मंडपांत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, आरत्या-भजनं गातली जातात आणि विसर्जनाने उत्सवाची सांगता होते. गणेशाला विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता मानले जाते, म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात बाप्पाच्या पूजनाने केली जाते. देशभरात गणपतीचे असंख्य मंदिरे आहेत; पण काही मंदिरे त्यांच्या अनोख्या परंपरा आणि वैशिष्ट्यांमुळे विशेष ओळख मिळवतात. त्यापैकीच एक म्हणजे राजस्थानच्या राजधानी जयपूरमधील गढ गणेश मंदिर.

3 वर्षांसाठी होणार राहण्या-खाण्याची सोय; क्रूझ कंपनी देत आहे 140 देश आणि 400 शहर फिरण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या स्पेशल ऑफर

बाल स्वरूपातील गणेश

या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे विराजमान असलेली गणेशमूर्ती. येथे बाप्पाची प्रतिमा बाल रूपात, म्हणजेच सोंड नसलेल्या स्वरूपात आहे. या मूर्तीला ‘पुरुषकृति स्वरूप’ म्हटले जाते. भक्तांच्या मते हे रूप अत्यंत अद्वितीय असून त्यामध्ये वेगळ्याच प्रकारची श्रद्धा आणि आकर्षण आहे.

300 वर्षांहून अधिक जुना इतिहास

गढ गणेश मंदिराची स्थापना 18व्या शतकात महाराजा सवाई जयसिंह दुसरे यांनी केली. जयपूर वसवण्यापूर्वी त्यांनी अश्वमेध यज्ञ केला होता, त्याच काळात या मंदिराचा पाया घातला गेला. विशेष म्हणजे त्यांनी गणेशमूर्ती अशी बसवली की सिटी पॅलेसच्या चंद्र महलातूनही दुर्बिणीने दर्शन घेता येईल. ही योजना त्यांच्या भक्ति-भावनेबरोबरच स्थापत्यकलेचे दृष्टीकोनही दर्शवते. याच मंदिराशी बाडी चौपड येथील ध्वजाधीश गणेश मंदिर जोडलेले मानले जाते.

मूषकांच्या कानात इच्छा सांगण्याची परंपरा

येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात ठेवलेले दोन विशाल मूषक. भक्त आपली समस्या किंवा इच्छा या मूषकांच्या कानात सांगतात. श्रद्धेनुसार हे मूषक थेट बाप्पापर्यंत ती गोष्ट पोहोचवतात आणि गणेश त्यांच्या अडचणी दूर करतात.

चिट्ठीद्वारे मन्नत व्यक्त करणे

या मंदिरात भक्त आपली मन्नत चिट्ठी किंवा निमंत्रण पत्राने व्यक्त करतात. घरातला शुभ सोहळा असो, लग्न, बाळंतपण, नवी नोकरी – सर्वप्रथम आमंत्रण गणेशाला पाठवले जाते. दररोज मंदिराच्या पत्त्यावर शेकडो पत्रे येतात. ती पत्रे वाचून देवाच्या चरणी अर्पण केली जातात. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून भक्तांचा ठाम विश्वास आहे की गणेश त्यांची प्रत्येक पुकार ऐकतात.

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

365 पायऱ्यांनंतर बाप्पाचे दर्शन

मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 365 पायऱ्या चढाव्या लागतात, ज्याचे प्रतीक म्हणजे वर्षातील 365 दिवस. ही चढाई थोडी दमवणारी असली तरी मंदिरात पोहोचल्यावर मिळणारी शांतता आणि समाधान सगळा थकवा दूर करते. येथून संपूर्ण जयपूर शहराचे मोहक दृश्य दिसते, विशेषत: सूर्यास्ताच्या वेळी. जर तुम्ही कधी जयपूरला भेट दिली, तर गढ गणेश मंदिराचे दर्शन नक्की घ्या. येथील शांत वातावरण आणि भक्तांचा अपार विश्वास तुम्हाला एक आगळावेगळा अनुभव देईल.

FAQs (संबंधित प्रश्न)

गणेश चतुर्थी २०२५ कधी आहे?
बुधवार, २७ ऑगस्ट

मंदिरात जाण्याची वेळ काय?
गढ गणेश मंदिर सकाळी ७:३० ते दुपारी १२:०० आणि संध्याकाळी ५:०० ते रात्री ८:०० पर्यंत खुले असते.

Web Title: Garh ganesh temple in jaipur where ganesh murti is seating without a trunk travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • rajasthan
  • travel news

संबंधित बातम्या

नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य
1

नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
2

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
3

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
4

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.