Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसगळतीची समस्या होईल मुळापासून दूर; फक्त स्वयंपाकघरातील या 3 पदार्थांची मदत घ्या; टक्कल झालेल्या जागीही उगवतील नवे केस

आपल्या घरात अनेक आयुर्वेदिक गोष्टी उपलब्ध असतात पण त्याकडे लक्ष जात नाही. आज आम्ही तुम्हाला अशा 3 पदार्थांविषयी सांगत आहोत ज्या केसगळतीवर प्रभावी उपाय ठरतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 18, 2025 | 09:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या केसगळती ही समस्या इतकी सामान्य झाली आहे की हवामान थोडंसं बदललं की आपल्याला वाटतं, की ‘ऋतू बदलतोय म्हणून केस गळत आहेत’. पण खरी गोष्ट ही आहे की यामागे ऋतू बदलणं हे फक्त एक कारण आहे. अनेकदा आपण रोजच्या आयुष्यात घेतलेले चुकीचे आहार, कमी झोप, मानसिक ताणतणाव आणि सतत वापरली जाणारी केमिकलयुक्त उत्पादने हे अधिक जबाबदार असतात.

पावसाळ्यातही वाढतोय डिहायड्रेशनचा धोका, होतोय अवयवांवर दुष्परिणाम; तज्ज्ञांनी दिला सतर्कतेचा इशारा

बहुतेक वेळा केस गळायला लागले की आपण पटकन शांपू, ऑइल किंवा कंडिशनर बदलतो. पण हे लगेच उत्पादने बदलणं कधी कधी केसांच्या आरोग्यावर आणखी वाईट परिणाम करू शकतं. अशा वेळी काही तज्ज्ञ, विशेषतः आयुर्वेदिक पद्धतीवर विश्वास ठेवणारे, नैसर्गिक घरगुती उपायांची शिफारस करतात.

डॉ. शैल गुप्ता हे प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, बहुतांश प्रकरणांमध्ये घरगुती उपायच अधिक फायदेशीर ठरतात. त्यांचा असा विश्वास आहे की निसर्गातील घटक केसांच्या मुळांवर काम करतात आणि त्यामुळे केसांची गळती थांबवण्यास मदत होते. त्यामुळे अनेकदा महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा आपण घरात असलेले सोपे उपाय वापरले तरी पुरेसे असते.

तीन घटकांचा प्रभावी उपाय
केसगळतीवर एक अत्यंत प्रभावी, सोपा आणि खर्चिक नसलेला उपाय म्हणजे कांद्याचा रस, नारळाचं तेल आणि लिंबाचा रस यांचा वापर. हे तीन घटक एकत्र केल्यावर तयार होणारं मिश्रण स्काल्पला पोषण देतं, डँड्रफ दूर करतं आणि केसांना मजबुती प्रदान करतं.

उपाय कसा करायचा?

  • १ चमचा कांद्याचा रस
  • १ चमचा नारळ तेल
  • अर्धा लिंबाचा रस
हे तिन्ही एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांच्या मुळांमध्ये बोटांनी सौम्यपणे मसाज करत लावा. साधारणपणे २० मिनिटे ठेवून नंतर माइल्ड शांपूने केस स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यात दोन वेळा करा. तीन आठवडे नियमित वापरल्यास केस गळती कमी होते हे लक्षात येईल.

घटकांचे फायदे

  • कांद्याचा रस: केसांच्या मुळांना सक्रीय करतो, रक्ताभिसरण वाढवतो.
  • नारळ तेल: खोलवर पोषण देतो, कोरडेपणा दूर करतो.
  • लिंबाचा रस: अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे डँड्रफ कमी करतो.

थेंब थेंब होतेय लघवी ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, रामदेव बाबांनी दिला देशी तगडा उपाय; त्वरीत थांबेल त्रास

केस गळत असतील तर लगेच उत्पादनं बदलण्याऐवजी, आधी केसांच्या मूळ समस्येवर काम करणं महत्त्वाचं आहे. घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी केवळ केसगळतीच नाही, तर एकूण केसांचं आरोग्य सुधारता येतं. फक्त नियमितता आणि संयम आवश्यक आहे. आठवड्यात दोनदा हा उपाय करून तुम्ही तुमचे केस पुन्हा एकदा दाट, आरोग्यदायी आणि चमकदार बनवू शकता.

Web Title: Hair loss problem will be eradicated from the root just take help of these 3 kitchen ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • amla for hair
  • daily news
  • hair care

संबंधित बातम्या

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल
1

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल

Top Marathi News Today Live : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरुन उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका
2

Top Marathi News Today Live : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरुन उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका

पेंडू येथे आढळला प्राचीन दगडी शिलालेख; ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी
3

पेंडू येथे आढळला प्राचीन दगडी शिलालेख; ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.