
आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या 'हे' ५ अतिशय सुंदर देश
Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
बाली
फिरण्यासाठी बाली हे एक लोकप्रिय आणि सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जाते. कमी बजेट आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर बाली तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो. ३ लाखाच्या बजेटमध्ये दोन व्यक्ती इथे आठवडाभराची ट्रिप प्लॅन करु शकतात. यात फ्लाईट तिकिट, प्रायव्हेट व्हिला आणि राहण्या-खाण्याचा खर्च समाविष्ट होतो. इथे फिरण्यासाठी उबुद, तेगल्लालंग राईस टेरेसेस, उलुवाटू आणि नुसा पेनिडा ही ठिकाणे सर्वोत्तम मानली जातात. तुम्हाला इथे समुद्रकिनारा, नैसर्गिक साैंदर्य आणि शांत वातावरणाचा अनुभव घेता येईल.
मालदीव
भारतीय पर्यटक अधिकतरवेळी इंटरनॅशनल ट्रीपसाठी मालदीव या ठिकाणाची निवड करतात. इथे समुद्रकिनारा, लग्झरी रिसाॅर्ट्स, व्हिला हे सर्व वाजवी दरात उपलब्ध होते. भारतीयांना इथे व्हिसा फ्रि एंट्री आहे ज्यामुळे प्रवास आणखी सोयीस्कर होतो. जर तुम्ही ४-स्टार किंवा रिसाॅर्टमध्ये राहण्याचा पर्याय निवडत असाल तर ३ लाखांच्या खर्चात तुमची ट्रीप आरामात पूर्ण होईल. या खर्चात इथे तुम्ही ४ ते ५ दिवसांची आलिशान सहल पूर्ण करु शकता.
दुबई
जर तुमचे बजेट ३ लाखांचे असेल तर यात तुम्ही दुबईची सैर करु शकता. इतक्या पैशांत दुबईत ५ ते ६ दिवस आरामात राहता येते. दुबई हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून इथे बुर्ज खलिफा, पाम जुमेराह, दुबई मॉल आणि दुबई फाउंटन सारख्या प्रसिद्ध स्थळांना भेट देता येऊ शकते. इथे तुम्ही गोल्ड शाॅपिंग करु शकता तसेच दुबईचा फेमस कुनाफा देखील खाऊ शकता. दुबईचे चाॅकलेट्स देखील जगभर फार लोकप्रिय असतात.
ग्रीस
भारतातून ग्रीसची आठवडाभराची ट्रीप ३ लाखांच्या बजेटमध्ये पूर्ण करता येऊ शकते. निळ्या पांढऱ्या घरांसाठी ओळखला जाणारा एक प्रसिद्ध युरोपियन देश आहे. ग्रीसमधील अथेन्स, सँटोरिनी आणि मायकोनोस यांसारखी सुंदर शहरे आणि बेट पर्यटकांमध्ये खास लोकप्रिय आहेत. तुम्हाला इथे अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे पाहू शकता.
‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
मॉरीशस
मॉरीशस हा देश देखील ३ लाखाच्या बजेटमध्ये फिरण्यासाठी एक चांगले इंटरनॅशनल ठिकाण ठरेल. इथे तुम्ही ३ लाखांच्या बजेटमध्ये ५ ते ६ दिवसांची ट्रिप पूर्ण करु शकता. या खर्चात फ्लाईट, उत्तम हाॅटेल आणि राहण्या-खाण्याची चांगली सोय होऊन जाईल. भारतीयांना या देशात फ्रि व्हिसा ऑन अराईव्हल दिले जाते. याची वैधता ६० दिवसांची आहे. यासाठी दूतावासात आगाऊ भेट देण्याची किंवा वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणाला ‘समुद्रावरील नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. इथे तुम्हाल हिंदूंची ५२ टक्के लोकसंख्या पाहायला मिळेल. हे ठिकाण निळेशार समुद्र, पांढऱ्या वाळूचे किनारे आणि पर्वतरांगांसांठी खास करुन ओळखले जाते.