
पावसाळ्यातील दूषित पाणी शरीरासाठी ठरेल जीवघेणे! आजारांपासून बचाव करण्यासाठी 'या' पद्धतीने करा पाण्याचे सेवन
पावसाळ्यात पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी?
पावसाळ्यात दूषित पाण्याचे सेवन केल्यास उद्भवणाऱ्या समस्या:
दूषित पाण्यामुळे होणारे आजार:
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराची काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कारण या दिवसांमध्ये रोगराई वेगाने वाढते. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी खड्यांमध्ये पाणी साचून राहते. साचून राहिलेल्या पाण्यात हानिकारक विषाणू मोठ्या प्रमाणावर वाढतात. तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ किंवा पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला धोका निर्माण होतो. दूषित पाण्याच्या सेवनामुळे उलट्या, जुलाब आणि फूड पॉयजनिंग होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पिणे फार आवश्यक आहे. पाण्याची योग्य साठवणूक आणि स्वच्छता सुद्धा अत्यंत महत्वाची ठरते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात दूषित पाण्याचे सेवन केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
Heart Health: फिट हार्ट, हेल्दी लाइफ! रोजच्या जीवनातील ‘या’ सवयी हृदयासाठी ठरतील वरदान
उघड्यावरील किंवा दूषित पाण्याचे सेवन केल्यामुळे जीवाणू आणि विषाणू आतड्यांना संक्रमित करतात. यामुळे पातळ शौचास होणे, उलट्या, मळमळ आणि पोट खराब होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. वारंवार जुलाब झाल्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होते, ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढतो. दूषित पाणी प्यायल्यामुळे थेट पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे यामुळे तीव्र पोटदुखी, गॅस होणे, पोट फुगणे, पोटात गोळे येणे, अपचन आणि भूक न लागणे यांसारखी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात.
सतत होणाऱ्या उलट्या आणि जुलाबांमुळे शरीरातील आवश्यक घटक बाहेर पडून जातात. ज्याच्या परिणामामुळे जास्त तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, चक्कर येणे, अशक्तपणा, डोळे खोल जाणे आणि लघवी कमी होणे, गडद पिवळी होणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. पण तरीसुद्धा अनेक लोक शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आजार आणखीनच वाढून आरोग्य बिघडते.
कॉलरा झाल्यानंतर पातळ जुलाब आणि तीव्र निर्जलीकरण होते.
टायफॉइड झाल्यानंतर दीर्घकाळ उच्च ताप, पोटदुखी आणि अशक्तपणा येतो
हिपॅटायटीस ए : यकृताचा संसर्ग ज्यामुळे कावीळ, ताप, उलट्या आणि थकवा येण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात रस्त्यावरील उघडे पाणी अजिबात पिऊ नये. पाणी १ ते २ मिनिट व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर गरम केलेले पाणी थंड करून नंतरच प्यावे. घरामध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी आरओ, यूव्ही किंवा प्रमाणित चांगले वॉटर फिल्टरचा वापर करावा. घरातील पाण्याची टाकी स्वच्छ करून घ्यावी. कारण महिनाभर पाण्याची टाकी स्वच्छ न केल्यास त्यातील हानिकारक विषाणू पोटात जाण्याची शक्यता असते.
Ans: दूषित पाणी पिल्याने टायफॉईड, कॉलरा, अतिसार, कावीळ (हेपेटायटिस A आणि E), गॅस्ट्रोएन्टेरायटिस यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.
Ans: पाणी उकळून किंवा प्रमाणित वॉटर फिल्टरद्वारे शुद्ध करून पिणे, स्वच्छ व झाकलेल्या भांड्यात साठवणे आणि पाणी काढताना स्वच्छ भांडे वापरणे आवश्यक आहे.
Ans: शक्यतो रस्त्यावरील किंवा स्वच्छतेची खात्री नसलेल्या ठिकाणचे पाणी पिणे टाळावे. सीलबंद बाटलीबंद पाणी किंवा शुद्ध केलेले पाणीच पिणे अधिक सुरक्षित ठरते.