
उन्हाळ्यात फायदेशीर मानला जाणारा सब्जा 'या' लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, जाणून घ्या सब्जा खाण्याची पद्धत
सब्जा खाण्याचे फायदे?
उन्हाळ्यात सब्जा बिया खाव्यात की नाही?
सब्जा बिया कोणी खाऊ नये?
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात बदल केला जातो. वाढत्या उष्णतेचा परिणाम शरीरावर होऊ नये म्हणून वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. कधी थंड दूध, ताक, दही, लस्सी प्यायली जाते तर कधी बाजारात विकत मिळणारे पॅक बंद सरबत प्यायले जातात. शरीराला आतून थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. अशावेळी सब्जाचे सेवन केले जाते. सब्जा खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरात वाढलेली उष्णता कमी करतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. सब्जा बिया फालुदा, सरबत किंवा विविध फळांपासून बनवलेली पेय बनवण्यासाठी केला जातो. उन्हाळ्यात वाढते पित्त आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सब्जा बियांचे पाणी किंवा पेय बनवून प्यायली जातात.(फोटो सौजन्य – istock)
पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच उपचार करून टाळता येईल मोठा धोका
सब्जा बियांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. पण सब्जा बियांचे सेवन केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला फायदे होतीलच असे नाही. आरोग्यासंबंधित गंभीर समस्या आणि काही विशेष प्रकृती असलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी सब्जा बियांचे सेवन करणे धोक्याचे ठरू शकते. याचे उलटे परिणाम शरीरावर होऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी सब्जा बियांचे अजिबात सेवन करू नये? सब्जा खाण्याची योग्य पद्धत? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अनेकांच्या शरीरात पित्त वाढते, छातीत जळजळ होणे किंवा आंबट ढेकर येणे इत्यादी पचनसंबंधित समस्या वाढू लागतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर वारंवार उलट्या, मळमळ किंवा डोकं दुखण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा सब्जा बिया टाकून काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर सब्जा बियांचे पाणी प्यावे. या बियांच्या सेवनामुळे पोटाच्या आतमध्ये संरक्षक कवच तयार होते, ज्यामुळे लिव्हरमधून अनावश्यक पित्त तयार होत नाही.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी सब्जा बियांचे सेवन करावे. कोणत्याही फळांचा रस बनवल्यानंतर त्यात भिजवलेल्या सब्जा बिया मिक्स करून प्यायला जातात. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होऊन जळजळ थांबते. हातापायांची आग होणे, डोळे जळजळणे किंवा खूप घाम येणे इत्यादी सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सब्जा बियांचे सेवन करावे. या बिया शरीरात वाढलेली उष्णता शोषून घेतात.
सतत आंबट ढेकर येतात? जेवताना केलेली एक चूक शरीरासाठी ठरेल धोक्याची, अपचनाच्या समस्येवर करा ‘हे’ उपाय
लहान मुलांनी सब्जा बियांचे सेवन अजिबात करू नये. लहान मुलांना सब्जा बिया व्यवस्थित गिळता येत नाहीत, ज्यामुळे त्या घशात किंवा श्वसननलिकेत अडकण्याची भीती असते. त्यामुळे लहान मुलांना सब्जा बिया खाण्यास देऊ नये. याशिवाय कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी सब्जा बियांचे सेवन अजिबात करू नये. सब्जा बियांमध्ये असलेले जास्त फायबर लहान मुलांच्या पचनक्रियेवर परिणाम करते. वारंवार पोट फुगणे किंवा गॅस, आतड्यांचे आजार इत्यादी समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी सब्जा बियांचे सेवन करणे टाळावे.
Ans: सब्जा बिया शरीराला थंडावा देतात, पचन सुधारतात आणि डिहायड्रेशन टाळण्यास मदत करतात, त्यामुळे उन्हाळ्यात त्यांचे सेवन फायदेशीर मानले जाते.
Ans: लो ब्लड प्रेशर असलेले लोक, गर्भवती महिला, लहान मुले आणि काही औषधे घेत असलेले रुग्ण यांनी सब्जा बिया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करू नयेत.
Ans: सब्जा बिया १५-२० मिनिटे पाण्यात भिजवून फुगल्यानंतरच सेवन कराव्यात. त्या सरबत, दूध किंवा ज्यूसमध्ये मिसळून खाल्ल्या जाऊ शकतात.