Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivaji Maharaj Punyatithi : शिवरायांचे महानिर्वाण कधी आणि कुठे झाले ?

छत्रपती शिवरायांच्या मृत्यूबाबत अनेक समज गैरसमज आहेत. इतिहासकारांमध्येही खूप मतमतांतरे पाहायला मिळतात. याबाबत इतिहास आणि संशोधक नेमकं काय म्हणतात ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2025 | 01:53 PM
Shivaji Maharaj Punyatithi : शिवरायांचे महानिर्वाण कधी आणि कुठे झाले ?
Follow Us
Close
Follow Us:

” हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा ” असं शिवरायांच्या अनेक विचारांपैकी हे एक वाक्य इतिहासात अमर आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात म्हणजेच वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्नराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. शहाजी राजांनी पाहिलेल्या स्वराज्याचं स्वप्न जिजाऊ आणि शिवरायांनी सत्यात उतरवलं. मुठभर सैन्य, हजारांच्या संख्येने आक्रमण करणाऱ्या परकीय सत्ता, यांच्यासमोर निभाव लागणं मोठं दिव्य स्वराज्यासमोर होतं. मात्र कधी गनिमी कावा तर ढाल तलवारींनी मराठ्यांनी परकीय सत्तांना दणाणून सोडलं होतं. महाराष्ट्रात म्हणजेच स्वराज्याच्या मातीत पाय ठेवणारा परमुलुखातील प्रत्येक सरदार शिवरायांना घाबरुन असे. राजांचं कार्यकाळ अवघ्या सुमारे 35 वर्षांचा होता. या पस्तीस वर्षांच्या कार्यकाळात राजांनी पहिली मोहिम जिंकली ती तोरणा किल्याची आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यानंतर अनेक किल्ले स्वराज्यात आले. अफजल खान, सिद्धी जोहर ,दिलेर खान अशा कितीतरी स्वराज्यावर चालून येणाऱ्या यवनांचा राजांनी खात्मा केला.

अवघ्य़ा पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत एवढा डोलारा सांंभाळण्यासाठी स्वराज्यात जीवाला जीव देणारी मातब्बर सरदारही होते. सततच्या धावपळी, नव्या मोहिमा, राजकारणातील डावपेच, सत्ता, स्वराज्य, घर कुटुंब या सगळ्यात कालांतराने राजांची तब्बेत ढासळत गेली. अखेर स्वराज्याचा हा तेजस्वी सूर्य 3 एप्रिल 1680 मध्ये मावळला. राजांच्या महानिर्वाणावरुन देखील इतिहासकारांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. राजांनी अखेरचा श्वास रायगडावर घेतला.राजांची समाधी देखील रायगडावर आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल विविध मते आहेत. काही ऐतिहासिक संदर्भांनुसार महाराजांना ताप आणि अतिसारामुळे मृत्यू झाला, तर काही संशोधक असेही सांगतात की त्यांना विषप्रयोग करून मारण्यात आले. तथापि, याबाबत निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत.

राजांनी अनेक सरदारांना वतनदारांना सळो कि पळो करुन सोडलं होतं. स्वराज्यात जसे जीवाला जीव देणारे सरदार होते तसेच पदासाठी हपापलेले आणि फितुरी करणारे ही होते. अनेकांना शिवरायांच्या धाडसाचं आणि कर्तृत्वाबाबत असुरक्षितता होती. राजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालट झाली. यावेळी अनेक फितुरांनी आणि परकीय सत्तांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मात्र शंभूराजेंनी कटकारस्थान रचणाऱ्य़ांचा डाव वेळोवेळी हाणून पाडला. शिवरायांच्या मृत्यूनंतरच बादशाह औरंगजेबाने पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाऊल ठेवलं. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी रायगड किल्ल्यावर बांधण्यात आली. आजही लाखो शिवभक्त त्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आणि पराक्रम यामुळेच ते भारताच्या इतिहासात अजरामर झाले. त्यांचे कार्य आणि ध्येय आजही अनेकांना प्रेरणा देते.त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याबाबत आजही संशोधन सुरू आहे, पण त्यांच्या निधनाने मराठा साम्राज्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं हे निश्चित आहे.

Web Title: Shivaji maharaj punyatithi when and where did shivaji maharaj die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj

संबंधित बातम्या

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस
1

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
2

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल
3

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार
4

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.