Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहिल्यानगरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यासाठी 12 कोटी 38 लाख रुपये मंजूर

अतिवृष्टी आणि पुरामुळे अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानाची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 10, 2025 | 04:59 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
  • अहिल्यानगरच्या जिल्ह्यासाठी 12 कोटी 38 लाख रुपये मंजूर
  • शेतकऱ्यांना मोठा दिलासा
अहिल्यानगर मध्ये सप्टेंबर 2025 च्या महिन्यात अतिवृष्टी व पूरामुळे झालेल्या शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीपोटी तर ऑक्टोबर २०२५ मध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना अनुक्रमे ९० कोटी ८६ लाख ९७ हजार आणि ४८२ कोटी १० लाख ६९ हजाराच्या मदतीसाठी निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना १२ कोटी ३८ लाख १८ हजार रूपयांची मदत मिळणार आहे. याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बाधितांना मिळणार मदत

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत आले आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूर यांसारख्या परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Ahilyanagar News: नदीचे पाणी दूषित असल्याने जेऊर ग्रामस्थ आक्रमक, आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर

ऑक्टोबर २०२५ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निर्णयानुसार (०–२ हेक्टर क्षेत्र) ४८२ कोटी १० लाख ६९ हजार आणि (२–३ हेक्टर क्षेत्र) ₹२ कोटी २९ लाख २३ हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावा, अशी बळीराजाची अपेक्षा आहे.

२९२५६ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान

अहिल्यानगर जिल्ह्यातील २९,२५६ शेतकऱ्यांच्या एकूण ६,७०३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आता ७ कोटी ६३ लाख ५४ हजार रुपयांचा मदतनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Gadchiroli Naxal Surrender: गडचिरोलीत मोठे यश! डीजीपी रश्मी शुक्लांसमोर ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ६,५५४ शेतकऱ्यांचे सुमारे १०१५.९९ हेक्टर क्षेत्रावरील शेतजमिनीचे नुकसान झाले होते. त्याबाबत ४ कोटी ७४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. शासनाच्या या मदतनिधी वितरणामुळे नैसर्गिक संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळण्यास मदत होणार आहे.

Web Title: 12 crore 38 lakh rupees fund announced for ahilyanagar flood and heavy rain affected farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahilyanagar villegers
  • Farmers

संबंधित बातम्या

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही
1

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा
2

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले
3

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध
4

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.