Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपघातग्रस्तांना आता एक लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा

रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटी अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांना दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्र्यांनी दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2025 | 07:48 AM
अपघातग्रस्तांना आता एक लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा

अपघातग्रस्तांना आता एक लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : रस्ते अपघातात जखमी आणि मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत आणि अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटी अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांना दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्र्यांनी दिला. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुंबईतील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामाचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले.

आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयात महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४१८० पर्यंत वाढविण्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे आदेश मंत्री आबिटकर यांनी यावेळी दिले.

रुग्णांच्या सोयीसाठी अॅप विकसित करणार

अपघातग्रस्तांना तातडीने उपचार देण्यासाठी अंगीकृत आणि अन्य रुग्णालयांनी, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असेदेखील आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले. गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र ‘मोबाईल अॅप’ विकसित करण्याचा निर्णयदेखील यावेळी घेण्यात आला.

कॅन्सरग्रस्त रुग्णांची माहिती असावी

कर्करोग संशयित, निदान झालेल्या व उपचारासाठी दाखल रुग्णांची तपशीलवार यादी ठेवावी. त्यांच्या दररोजच्या तपासण्यांची माहिती अचूकपणे भरावी. जिल्हास्तरावर अधिकारी व उपसंचालक यांनी अधिनस्त संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देशदेखील आरोग्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दिली जात आहे.

Web Title: Accident victims will now get cashless treatment up to rs 1 lakh says minister prakash abitkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 07:48 AM

Topics:  

  • Accident Case
  • maharashtra government decision
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

मुंबई मेट्रो पुल दुर्घटनेनंतर कलाकार आक्रमक; Varun Grover चे भ्रष्टाचारावर वक्तव्य, Rahul Vaidya चीही प्रतिक्रिया
1

मुंबई मेट्रो पुल दुर्घटनेनंतर कलाकार आक्रमक; Varun Grover चे भ्रष्टाचारावर वक्तव्य, Rahul Vaidya चीही प्रतिक्रिया

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर
2

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्
3

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये सहलीच्या बसला अपघात; वाहनावरील ताबा सुटला अन् थेट…
4

रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये सहलीच्या बसला अपघात; वाहनावरील ताबा सुटला अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.