Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

कर्जत तालुक्यातील २०८ गावांमधील भाताच्या शेतीचे पंचनामे करण्याचे कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कृषी,महसूल आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर पोहचले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 01, 2025 | 03:50 PM
ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर (फोटो सौजन्य-X)

ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत : कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने भाताचे एक शेतात कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या अगणित नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी सात्यत्याने होत होती आणि त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कर्जत तहसीलदार यांच्याकडून तालुक्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान अगदीच दुसऱ्याच दिवशी कृषी विभाग,महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेताच्या बांधावर पोहचले असून प्रत्यक्ष २०८ महसुली गावामध्ये आणि आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.

दोन सख्ख्या भावांनी केली भावाची हत्या; न्यायालयाने आरोपी भावंडांना सुनावली ‘ही’ शिक्षा

कर्जत तालुक्यात यावर्षी साधारण सात हजार हेटकरी जमिनीवर भाताची शेती खरीप हंगामात करण्यात आली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अंदाजाप्रमाणे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि भाताचे पीक जमिनीवर कोसळले. भाताच्या शेतीचे झालेले नुकसान आणि सुरु असलेला पाऊस लक्षात घेऊन भाताचे पीक आणखी एक दोन आठवडे पाण्यात राहण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन किसान क्रांती संघटना या संघटना आणि आरपीआय, भाजप या पक्षांनी शेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश आल्यानंतर कर्जत तहसीलदर यांच्याकडून कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत वोवीभाग यांची बैठक घेऊन पाणचनामे करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यावेळी तालुका पंचायत समितीचे गटविकासअधिकारी सुशांत पाटील,तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे आणि निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्या उपस्थितीत भाताच्या शेतीच्या नुकसान बद्दल पंचनामे करण्याचं आराखडा त्यायर करण्यात आला होता.

त्यानुसार कर्जत तालुक्यातील सर्व २०८ गावातील भाताच्या शेतीचजि पाहणी तसेच आदिवासी वाड्यांमधील भाताची तसेच नाचणी वरी यांच्या शेतीच्या पिकाची पाहणी करून घटनास्थळी जाऊन पंचनामे देण्याचे आदेश २९ सप्टेंबर रोजी देण्यात आले. त्यानुसार आज सकाळ पासून कृषी अधिकारी, कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, तसेच कृषी विस्तर अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून शेत जमिनीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे.

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

Web Title: Actual commencement of the work of conducting rice crop surveys in 208 villages of karjat taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Farmers
  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
2

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच
3

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?
4

शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.