Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Thackeray : भाजपने औरंगजेबाचा विषय का बंद पाडला? आदित्य ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

'औरंगजेबाचा विषय भाजपने काढला आणि दंगल नागपूरमध्ये झाली. छत्रपती संभाजीनगर कुठे आणि नागपूर कुठे किती आहे बघा. सगळं अंगलट आल्यानंतर हा विषय बंद पण भाजपने पाडला, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 16, 2025 | 05:45 PM
भाजपने औरंगजेबाचा विषय का बंद पाडला'; निर्धार शिबिरातून आदित्य ठाकरेंचा घणाघात

भाजपने औरंगजेबाचा विषय का बंद पाडला'; निर्धार शिबिरातून आदित्य ठाकरेंचा घणाघात

Follow Us
Close
Follow Us:

‘महाराष्ट्रात औरंगजेबाचा विषय भाजपने काढला आणि दंगल नागपूरमध्ये झाली. छत्रपती संभाजीनगर कुठे आणि नागपूर कुठे किती आहे बघा. सगळं अंगलट आल्यानंतर हा विषय बंद पण भाजपने पाडला. वरून केंद्रातून फोन आला की त्या कबरीला हात नाही लावायचा. त्या कबरीला संरक्षणही सरकारने दिलं आणि केंद्रात आणि भाजपचं सरकार आहे. त्या कबरीला समाधीचा म्हणून उल्लेख आणि आदर देखील भाजपने केला, असा सनसणीत टोला शिवसेना युवासेनेचे नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी केला. नाशिक जिल्ह्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांचे निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळीते बोलत होते.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, नागपूर शांतताप्रीय शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र महायुती सरकारच्या फक्त १०० दिवसांच्या काळातच नागपूरमध्ये दंगल घडली. भाजपने काल नाशिकमध्ये देखील दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. जो महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आणि पुरोगामी म्हणून ओळकला जात होता. पुढे जाणारा महाराष्ट्र होता. त्या महाराष्ट्राच्या शांत शहरांमध्ये देखील दंगली घडवल्या जात आहेत. अशा शहरांध्ये जर दंगल व्हायला लागली तर गुंतवणूकदार येतील का?. उद्योगपती राहतील का?, नोकऱ्या मिळतील? कोणीच राहणार नाही.’, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

‘मी भाजप आणि महाराष्ट्राला वेगवेगळं समजतो. निजामांनी जसं महाराष्ट्रावर आक्रमण केलं होतं तसं भाजपने आक्रमण करून महाराष्ट्राला हडपलेले आहे. पण आम्ही त्यांना आक्रमण करून देणार नाही. ती औरंगजेबाची कबर प्रतीक आहे, असं महाराष्ट्र बोलत आहे. तुमची जातपात धर्म कोणताही असो, तुमचा संघ कितीही बलाढ्य असो पण जो कोणी आमच्या महाराष्ट्रावर चालून येईल त्याला या मातीत गाढला जाईल ते हे प्रतीक आहे. पण ते प्रतीक देखील पुसून टाकण्याचा डाव आहे. भाजपला महाराष्ट्राची स्वराज्याची शौर्यगाथा पुसून टाकायची आहे.’

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकरी उल्लेख देखील भाजपच करत आहे. कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारी, गृहमंत्री कोणाचे आहेत. सर्व भाजपचे आहेत. हे सर्व महाराजांचा अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान त्याचेचं लोकं करत आहेत. समृद्ध महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम भाजप करत आहे. शेतकरी जातपात बघत नव्हते. पण समाजामध्ये वाद निर्माण करून जातीपातीमध्ये भांडणं लावणारा पक्ष भाजप आहे. शेतकरी, महिला तरुण धर्म कधी बघत नव्हते. त्यांना नोकऱ्या, अन्न-वस्त्र निवारा पाहिजे. पण आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा आमच्यामध्ये फळी निर्माण करण्याचा, विष कालवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. तर तुम्हीच विचार करा आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे?’, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

Web Title: Aditya thackeray attack on bjp aurangzeb topic closed latest maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • BJP
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.