Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खारघर दुर्घटनेतून घेतला धडा, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समर्थ बैठकीमध्ये केला ‘हा’ बदल

श्री समर्थ बैठकीला मोठ्या प्रमाणात श्री सदस्य हे जातात. आठवड्यात एक दिवस आयोजित करण्यात येणारी ही बैठक साधारण अडीच तास असते. पुरूषांची बैठक ही साधारण संध्याकाळी 7.30 नंतर भरते. महिलांची बैठक ही सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरवली जाते.

  • By साधना
Updated On: Jun 01, 2023 | 03:44 PM
appasaheb dharmadhikari

appasaheb dharmadhikari

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: नवी मुंबईतील खारघर परिसरात काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात भीषण दुर्घटना घडली होती. याठिकाणी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील श्री सेवकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी तब्बल 20 लाखांची गर्दी जमली होती. या श्री सेवकांना दुपारच्या रणरणत्या उन्हात बसावे लागलं. त्यामुळे त्यापैकी 14 जणांचा उष्माघाताने (Heat Stroke) आणि पाण्याच्या कमतरतेने मृ्त्यू झाला होता.( Kharghar Tragedy)

ही भीषण दुर्घटना सरकार, प्रशासन आणि अन्य यंत्रणांना खडबडून जागी करणारी ठरली होती. या दुर्घटनेमुळे शिंदे-फडणवीस सरकार आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. यानंतर राज्यभरात दिवसा आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी खबरदारी घेतली आहे. या सगळ्यातून धर्माधिकारी प्रतिष्ठानानेही एक महत्त्वाचा धडा घेत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात आयोजित केलेल्या जाणाऱ्या समर्थ बैठकांबाबत काही बदल करण्यात आले आहेत.

श्री समर्थ बैठकीला मोठ्या प्रमाणात श्री सदस्य हे जातात. आठवड्यात एक दिवस आयोजित करण्यात येणारी ही बैठक साधारण अडीच तास असते. पुरूषांची बैठक ही साधारण संध्याकाळी 7.30 नंतर भरते. महिलांची बैठक ही सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरवली जाते. अनेक ठिकाणी बैठक ही सकाळी 10.30 आणि दुपारी 1.30 वाजता असते. पण महाराष्ट्र भूषण दुर्घटनेनंतर उष्माघाताचा मुद्दा ऐरणीवर आला. अशावेळी आधीच एका कार्यक्रमात उष्माघाताने झालेल्या अप्रिय घटनेची जाणीव ठेवून बैठकीची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, महिलांच्या दुपारच्या बैठका या रद्द करण्यात आल्या आहेत. आता फक्त सकाळी 7.5o ते 10 वाजेपर्यंतच या बैठका असणार आहेत.

समर्थ बैठकीबाबत सूचना
श्री सद्गुरू आज्ञेने श्री समर्थ महिला बैठक वेळेबाबत सूचना. वातावरणातील तापमान वाढीमुळे महाराष्ट्रातील सर्व श्री समर्थ महिला बैठक बुधवार 31 मे पासून बैठकीची वेळ बदलली आहे. येत्या बुधवारपासून सर्व महिला बैठकांची वेळ ही सकाळी 7.50 ते 10 वाजेपर्यंत असेल.

सकाळी 7.50 ते 8.00 : श्री मनाचे श्लोक
सकाळी 8.00 ते 8.45 : श्री मंगलाचरण
सकाळी 8.45 ते 10.00 : श्री वर्तमान समास

Web Title: After kharghar tragedy appasaheb dharmadhikari changed timing of baithak nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2023 | 03:40 PM

Topics:  

  • appasaheb dharmadhikari
  • maharashtra news

संबंधित बातम्या

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती
1

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
2

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण
3

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
4

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.