Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरयाणाच्या निकालाचा महाराष्ट्रातही होणार परिणाम; महायुतीने बदलली ‘ही’ स्ट्रॅटेजी

काल हरयाणा  आणि जम्मू-कश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीपूर्वी हरयाणात काँग्रेसचा विजय होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. पण हरयाणात एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपने बहुमताचा आकडा गाठत दणदणीत विजय मिळवला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 09, 2024 | 10:46 AM
हरयाणाच्या निकालाचा महाराष्ट्रातही होणार परिणाम; महायुतीने बदलली ‘ही’ स्ट्रॅटेजी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. राजकीय पक्षांच्या जोरदार मोर्चेबांधण, सभा, बैठका, दौरे, मेळाव्यांची लगबग सुरू आहे. महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत असतानाच काल ( 8 ऑक्टोबरला) हरयाणा आणि जम्मू-कश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. हरयाणात भाजपचा तर जम्मू-कश्मीरमध्ये काँग्रेसचा विजय झाला. या निवडणुकांच्या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकांवरही होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत  राजकीय पक्षांमध्ये मोठी फाईट होणार आहे. महायुतीलील तीन पक्ष आणि महाविकास आघाडीतील तीन पक्षांची लढत होणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यामुळे एकाच मतदारसंघात प्रतिस्पर्धी एकाच आघाडीतल असणार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरीही होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मतदारांसमोर बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा पर्यायही मतदारांना मिळणार आहे. त्यात मनोज जरांगे पाटलांनाही सोबत घेण्यासाठी तिसऱ्या आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीवरही याचा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंची पुन्हा मागणी? हरयाणातील निकालाचे महाराष्ट्रावर पडसाद?

दरम्यान, काल हरयाणा  आणि जम्मू-कश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीपूर्वी हरयाणात काँग्रेसचा विजय होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. पण हरयाणात एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोट ठरवत भाजपने बहुमताचा आकडा गाठत दणदणीत विजय मिळवला. हरयाणाच्या निकानंतर महाराष्ट्रातही भाजपने आपले स्टाईल बदलल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसात, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इमकमिंग सुरू झाले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याबाबत असणारही सहानुभूतीची लाट कायम आहे. याशिवाय बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण आणि शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर महायुती काही प्रमाणात बॅकफूटवर गेली होते. पण हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. पण त्यानंतरही महायुतीलला अपेक्षित असा परिणाम दिसत नव्हता. त्यामुळे महायुतीत काही प्रमाणात नाराजीही दिसून येत  होती. पण कालच्या हरयाणाच्या निकालामुळे महायुतीला एक नवा बुस्टर मिळाला आहे. महाराष्ट्रात महायुतीतील नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यापार्श्वभूमीवर हरयाणातील विजय भाजपसाठी हा बुस्टर डोस मानला जात आहे.

हेही वाचा: काँग्रेसमध्ये छुप्या बैठकांचे सत्र पक्ष नेतृत्त्वासमोरील टेन्शन वाढले, पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघड

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने मित्रपक्ष असेल्लया शिंदे गटाच्या आमदार असलेल्या जागांव्यतिरिक्त  कोणत्या मतदारसंघात निवडून येण्याची सर्वाधिक क्षमता असलेले उमेदवार आहेत, याबाबत भाजपने विचारणा केली आहे. विद्यमान आमदारांच्या जागा वगळता इतर कोणतीही जागा हवी असेल तर, जिंकण्याची क्षमता असलेला  उमेदवार दाखवा आणि मगच मतदारसंघ घ्या, अशी भाजपची स्ट्रॅटेजी असणार आहे.

तर येत्या आठवडाभरात भाजपची पहिली यादी  दाहीर केली जाईल विधासनभाच्या उमेदवार निश्चित करण्यासाठी पुढच्या दोन दिवसात भाजपच्या बैठका होतील. उमेदवारांची निवड प्रक्रिया जाहीर केली जाईल. त्यासाठी काल रात्री उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर बैठकही झाली. त्यानंतर इतर विभागांसाठीही बैठका होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: After the haryana result the grand alliance changed its strategy in maharashtra nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 10:37 AM

Topics:  

  • haryana assembly election 2024
  • Maharashtra Assembly Elecion 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
3

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश
4

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.