Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: नदीचे पाणी दूषित असल्याने जेऊर ग्रामस्थ आक्रमक, आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर

जेऊर गावातील मुख्य उपनदी म्हणून ओळखली जाणारी खारोळी नदी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. यामुळे तेथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 10, 2025 | 04:26 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • जेऊर गावातील नदी प्रदूषित
  • ग्रामस्थ झाले आक्रमक
  • गावकरांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर
नगर तालुक्यातील जेऊर परिसरातील सीना नदीची मुख्य उपनदी खारोळी नदीचे जनावरांच्या गोठ्यामुळे पाणी दूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून याविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संबंधित गोठ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. सदर दुषीत पाण्याची पाहणी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामविकास अधिकारी भागुजी मेहेत्रे यांनी केली.

जेऊर परिसरातून सीना व खारोळी या दोन मुख्य नद्या वाहत आहेत, नद्यांवर झालेल्या विविध बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून खारोळी नदीच्या परिसरात झालेल्या जनावरांच्या गोठ्यांमुळे नदीचे तसेच परिसरातील विहिरींचे पाणी दूषित होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. गोठ्यातील मलमूत्र व शेणखतामुळे परिसरातील पाणी दूषित होत असून पिण्यायोग्य राहिलेले नाही. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Indigo Crisis चा फटका मावळच्या गुलाब उत्पादकांना; लाखोंचे नुकसान अन्…

आजाराचे प्रमाण वाढले

मागील वर्षी सदर गोठ्यांबाबत लिगाडे वस्ती येथील नागरिकांनी देखील तीव्र आक्षेप घेतला होता. खारोळी नदीचे पाणी म्हस्के वस्ती परिसरातील बंधाऱ्यात पूर्णता दूषित झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे म्हस्के वस्तीवरील तरुणांनी आक्रमक होत संबंधित गोठ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिक व लहान मुले मोठ्या प्रमाणात आजारी पडले असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात आले. संबंधित गोठ्यामुळे शेटे वस्ती, लिगाडे वस्ती, म्हस्के वस्ती, चापेवाडी परिसर, बेल्हेकर, कोथिंबीरे मळा, ठोंबरे मळा परिसरातील पाणी दूषित होत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन

दिला आंदोलनाचा इशारा

परिसरातील पाणी दूषित करणाऱ्या संबंधित गोठ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी मागणी केली आहे.

संबंधित जनावरांच्या गोठ्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खारोळी नदीच्या तीरावर असणाऱ्या विहिरी, कुपनलिका, हातपंप यांचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे संबंधित गोठ्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा म्हस्के वस्ती येथील तरुणांकडून देण्यात आला आहे.

Web Title: Ahilyanagar jeur village kharoli river polluted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

कोणताही गाजावाजा न करता…, प्रभासच्या साधेपणाने पुन्हा जिंकलं प्रेक्षकांचं मनं, खऱ्या आयुष्यातही ठरला हिरो
1

कोणताही गाजावाजा न करता…, प्रभासच्या साधेपणाने पुन्हा जिंकलं प्रेक्षकांचं मनं, खऱ्या आयुष्यातही ठरला हिरो

एकच झुंबड… लोकांनी नाही ऐकला PM Modi यांचा सल्ला; Gold खरेदीसाठी गर्दी? अवघ्या दोनच दिवसांत रिकामी झाले शोरूम्स?
2

एकच झुंबड… लोकांनी नाही ऐकला PM Modi यांचा सल्ला; Gold खरेदीसाठी गर्दी? अवघ्या दोनच दिवसांत रिकामी झाले शोरूम्स?

आर्थिक नियोजनात महिलांचा टक्का वाढला! Bandhan Life च्या पॉलिसीधारकांमध्ये 35 टक्क्यांची मोठी झेप
3

आर्थिक नियोजनात महिलांचा टक्का वाढला! Bandhan Life च्या पॉलिसीधारकांमध्ये 35 टक्क्यांची मोठी झेप

तंत्रज्ञान क्षेत्रात HP चा धमाका! भारतात 20 हून अधिक नवीन AI उत्पादने लाँच
4

तंत्रज्ञान क्षेत्रात HP चा धमाका! भारतात 20 हून अधिक नवीन AI उत्पादने लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.