Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: कोपरगाव पॅटर्नची सगळीकडे चर्चा! तहसीलदारांनी थेट बांधावर जाऊनच…

सध्या अहिल्यानगरमध्ये कोपरगाव पॅटर्नची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न थेट शेत बांधावर जाऊन सोडवले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 30, 2025 | 04:02 PM
Ahilyanagar News: कोपरगाव पॅटर्नची सगळीकडे चर्चा! तहसीलदारांनी थेट बांधावर जाऊनच...

Ahilyanagar News: कोपरगाव पॅटर्नची सगळीकडे चर्चा! तहसीलदारांनी थेट बांधावर जाऊनच...

Follow Us
Close
Follow Us:
  • अ. नगरमध्ये कोपरगाव पॅर्टनची चर्चा
  • शेतशिवार रस्त्यांवरील प्रलंबित प्रकरणांवर थेट बांधावर जाऊन न्यायनिवडा केला
  • ६० रस्ते मोकळे, ३५ गावांना फायदा
संजय देशपांडे / अहिल्यानगर :कोपरगाव तालुक्यातील शेतशिवार रस्त्यांवरील प्रलंबित प्रकरणांवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. मागील तीन महिन्यांत ६० प्रकरणे निकाली काढून सुमारे ४५ किमी रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे ३५४ कुटुंबांना शेतरस्त्याची सुविधा मिळाली असून २१७५ शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. सावंत यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, तो आता ‘कोपरगाव पॅटर्न’ म्हणून राज्यभर गाजत आहे.

शेतीपूरक भागातील वादांना सामोपचाराने तोडगा

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र जमिनीचे तुकडे, कौटुंबिक वाटणी आणि खरेदी-विक्री व्यवहारांमुळे शेतरस्त्यांवरून वाद निर्माण होत होते. यामुळे वेळ, श्रम आणि संसाधनांचा अपव्यय तर होताच, पण कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सावंत यांनी ‘बांधावरच न्यायनिवाडा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला.

कलाग्राम उद्घाटनाला वर्ष उलटूनही एकही कार्यक्रम नाही; तब्बल वर्षाभरानंतर होणार पहिला सांस्कृतिक कार्यक्रम

६० रस्ते मोकळे, ३५ गावांना फायदा

या उपक्रमांतर्गत गावनकाशानुसार अतिक्रमित किंवा बंद झालेले शिवाररस्ते, गाडीमार्ग व पायमार्ग मोकळे करण्यात आले आहेत. आतापर्यंत करंजी, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, शहाजापूर, शिरसगाय, संवत्सर, ओगदी, मलेगावबडी, धौडेवाडी, सांगवी भुसार, कोकमठाण, नाटेगाव, देहें बांदवड, कोळपेवाडी, मढी, तिळवणी, गोधेगाव, वारी, वाकडी, धामोरी, तळेगाव मळे, वेळापूर, करसली, कासली आणि मनेगाव आदी ३५ गावांतील शिवार रस्ते खुले करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांचा अनुभव : “३० वर्षांचा वाद मिटला”

सडे गावातील शेतकरी विजय पाटील, छब्बू बारहाते, सतिष बारहाते आणि तुळशीराम लोहकणे म्हणाले,
“गेल्या ३०-३५ वर्षांपासून सतीच्या बांधाचा रस्ता वादग्रस्त होता. तहसीलदार सावंत दोनदा बांधावर आले, सर्वांशी संवाद साधला आणि सामोपचाराने रस्ता खुला झाला. आता दोन किलोमीटरचा रस्ता सर्वांसाठी खुला झाला असून शंभरहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.”

‘बांधावरच न्यायनिवाडा’ उपक्रमाचे कौतुक

उपविभागीय अधिकारी माणिक आहेर म्हणाले, “शेतजमिनींच्या विभाजनामुळे रस्त्यांवरील वाद वाढले होते. मात्र तहसीलदार सावंत यांनी ६० प्रकरणे सामोपचाराने निकाली काढली. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचले, तसेच अपील आणि पुनर्विचार प्रकरणांची संख्याही घटली आहे. हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे.”

Jalgaon News: परतीच्या पावसाचा दणका! कचऱ्यांच्या ढिगांचे वाढले साम्राज्य, आरोग्यालाही धोका

महसूलमंत्र्यांचा संकल्प, जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

“प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता मिळालाच पाहिजे,” असा संकल्प महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला असून, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे. गावपातळीवरच वाद मिटवल्याने जय-पराजयाची भावना संपली आणि अपीलांचे प्रमाण जवळपास शून्य झाले आहे.

Web Title: Ahilyanagar kopargaon tehsildars mahesh sawant solve farmers problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • farmer
  • kopargoan
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ratnagiri News : पालिकेच्या नव्या इमारतीसाठी महिनाभरात निधी देणार; उदय सामंत यांचं आश्वासन
1

Ratnagiri News : पालिकेच्या नव्या इमारतीसाठी महिनाभरात निधी देणार; उदय सामंत यांचं आश्वासन

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश
2

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा
3

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप
4

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.