
सुरक्षित वाहतूक आणि स्वच्छ परिसर या उद्देशाने अहिल्यानगर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यान परिसरात महापालिकेने कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली आहेत. यापुढे रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे. दरम्यान, कापड बाजारात व्यावसायिकांनी रस्त्यावर ठेवलेल्या वस्तू शहर वाहतूक पोलिसांनी जप्त करतकारवाई केली. वाहतूक शाखा आणि महापालिका यांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. येथील महालक्ष्मी उद्यानामध्ये रोज मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि लहान मुले विरंगुळ्यासाठी येत असतात.
Kolhapur News : पूरमुक्तीसाठी इचलकरंजीला 450कोटी निधी; खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश
मात्र,उद्यानाच्या बाहेर अनेक खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि अनधिकृत टपऱ्यांचे अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणांमुळे नागरिकांना पायी चालण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच, वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती, परिसरात – मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता वाढत चालली होती. महापालिकेने आज कारवाई – हाती घेतली असली तरी त्यात सातत्य – ठेवण्याची गरज आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि परिसर स्वच्छ राहावा यासाठी रस्ते मोकळे ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सुरक्षित वाहतूक आणि स्वच्छ परिसर या उद्देशाने अहिल्यानगर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यान परिसरात महापालिकेने कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली असून ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.
नागरिकांची गैरसोय आणि वाढती अस्वच्छता लक्षात घेऊन महापालिकेच्या – अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने उद्यानाबाहेर उभ्या असलेल्या सर्व खाद्यपदार्थांच्या हातगाड्या तसेच अनधिकृत गाड्या हटवल्या आहेत. शहरात रस्ते व सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये. यापुढे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर केवळ दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.
शहरातील नेहमी गजबजलेला कापड बाजार भागात व्यावसायिकांनी रस्त्यावर वस्तू, फलक ठेवल्याने अडचण निर्माण होत असे. वाहतूक पोलिसांनी थेट कारवाई करण्याऐवजी अगोदर त्या परिसरात ध्वनिक्षेपकद्वारे आवाहन करून वस्तू रस्त्यावर ठेऊ नका, असे सांगितले, दुसऱ्या दिवशी ज्यांच्या वस्तू रस्त्यावर होत्या त्या जप्त करण्यात आल्या.