Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने रडगाणं सुरु, एकनाथ शिंदे यांची राहुल गांधींवर खरमरीत टीका

‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा, मतांची चोरी अशा कथा रंगवून ते पार्श्वभूमी तयार करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी गांधी यांना लगावला. नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2025 | 06:11 PM
बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने रडगाणं सुरु, एकनाथ शिंदे यांची राहुल गांधींवर खरमरीत टीका (फोटो सौजन्य-X)

बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने रडगाणं सुरु, एकनाथ शिंदे यांची राहुल गांधींवर खरमरीत टीका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने राहुल गांधी यांचे रडगाणे सुरु आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. बिहारमध्ये पराभव निश्चित असल्याचा अंदाज आल्याने त्यांच रडगाणं सुरु आहे. ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा, मतांची चोरी अशा कथा रंगवून ते पार्श्वभूमी तयार करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी गांधी यांना लगावला. नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीसंदर्भात गांधी यांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम बंद करावे, असे ते म्हणाले.

जुन्या, धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम! 14 वर्षांपासून पुनर्विकास रखडल्याने रहिवासी न्यायालयात

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारच्या काळात निवडणूक आयोगाचा गैरवापर आणि सर्वात मोठा घोटाळा झाला होता. तत्कालीन निवडणूक आयुक्त एम.एस गिल यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी रोखला होता. पुढे एम.एस गिल यांना काँग्रेसने मंत्रिपदाचे बक्षीस दिले हा सर्वात मोठा घोटाळा होता. त्यामुळे राहुल गांधींना महाराष्ट्रातील निवडणुकीवर आरोप करण्याचा अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खडसावले.

काँग्रेसचा जेव्हा निवडणुकीत पराभव होतो, तेव्हा निवडणूक आयोग, ईव्हीएम यावर चोरीचा आळ घेणे हा राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. विरोधी पक्ष नेते पदावर असताना गांधी यांनी निवडणूक आयोगाचं, निवडणुकीच, मतांचे भान बाळगायला हवे. महाराष्ट्रातील निवडणुकीवर आरोप करणं हे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर सरासरी ७० मते वाढली तर एकूण आकडा ७० लाखांपर्यंत जातो. लाडकी बहिण योजना राज्यात जाहीर झाल्यानंतर सर्वांनीच महायुतीला विजयी करण्याचे ठरवले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. मात्र गांधी हे मान्य करायला तयार नाहीत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३१ जागांवर विजय मिळाला तर महायुतीला १७ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसने मतांची चोरी केली असे म्हणायचे का, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने काँग्रेस पक्षात केला प्रवेश

Web Title: As defeat started to seem evident in the bihar elections the lamenting began and eknath shinde made a scathing criticism of rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
1

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल; एबीसीमध्ये तब्बल ३९.६७ लाख विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स जमा
2

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल; एबीसीमध्ये तब्बल ३९.६७ लाख विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स जमा

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?
3

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर
4

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.