Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात…; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राज्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला जातो. याआधी कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याने आता फडणवीस यांचे गृहमंत्री पद काढून ते अजितदादांना द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देखील केली होती. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 31, 2024 | 05:15 PM
'विधानसभेत भाजपच मोठा पक्ष, निवडणुकीनंतरही पहिल्या क्रमांकावरच राहणार'; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

'विधानसभेत भाजपच मोठा पक्ष, निवडणुकीनंतरही पहिल्या क्रमांकावरच राहणार'; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पोलीस पाटलांशी संवाद साधला. यावेळी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी गृहमंत्री म्हणून संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी राज्याचा गृहमंत्री आहे मात्र पोलीस पाटील हे त्यांच्या त्यांच्या गावाचे गृहमंत्रीच आहात हे विसरु नका. तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तुमचा मोठा वाटा आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार केला याचं समाधान आहे, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या. तसेच विरोधकांनी टीका देखील केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूरमध्ये कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात. काही लोकांचा शौक असा आहे की सकाळी उठून कॅमेरासमोर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पचत नाही. एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर त्यांना अपचन होतं. पण पोलीस पाटील संघटना अशी आहे की ज्यांनी मागे लागून त्यांचं काम करुन घेतलं. पण कुणी काम केलं ते ही संघटना विसरली नाही. आज मला इथे बोलवून माझा सत्कार केलात त्याबद्दल आपले आभार मानतो,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

तेव्हा मी चंग बांधला होता

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटील यांची मोठी समस्या सोडवली. फडणवीस म्हणाले, “मला पोलीस पाटील संघटनेचे लोक भेटायचे तेव्हा मला ते सांगायचे आम्हाला हिणवलं जातं, बिन पगारी फुल अधिकारी. मी त्यांना म्हटलं काळजी करु नका, फुल पगारी आणि फुल अधिकारी असाच दर्जा आम्ही तुम्हाला देणार आहोत. तेव्हा मी चंग बांधला, मानाच्या पदाला आम्ही 15 हजार रुपये मानधन केलं. दोन तीन दिवसांपूर्वी सांगितलं असतं मी पैसे खात्यात जमा करुनच आलो असतो. सोमवारी जी. आर. निघून पैसे खात्यात गेले पाहिजेत असा आदेश मी दिला आहे. चार महिन्यांचे पैसे खात्यात जातील आणि दर महिन्याला योग्य प्रकारे तुमच्या खात्यात येतील,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Being a state home minister is like wearing thorn crown says devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 05:15 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.